ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.475

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, ज्ञानकाण्ड.  
प्रकरण :-१ ले, अद्वैत अभंग ४७५

तैचि ज्ञानियासी होईजेल मोक्ष । ज्ञानेश्वर लक्ष लक्षितसे ॥१॥ पहाण्याशी मूळ विचारुनि पहा । मग सुखी रहा निरंजनीं ॥२॥ इवलुसा प्रपंच परी तो बद्ध कीं । सज्ञानी विवेकी न शिवती ॥३॥ पयाचिये कुंभीं पडे बिंदुविष । चतुर तयास न घेपती ॥४॥ षड्रस पक्वानें वाढिली खापरी । श्वान शिवे श्रोत्री स्पर्शीतीना ॥५॥ घालुनियां कडें शून्याशी बांधितां । त्याचिया गणिता न करवे ॥६॥ सर्वही उपाधि त्यागुनि आकार । राहे ज्ञानेश्वर निजरूपीं ॥७॥

अर्थ:-

जेव्हां लक्षावर लक्ष असेल तेव्हांच ज्ञानाने ज्ञानीपुरुषास मोक्षप्राप्ती होईल, तद्वत माऊलीचे लक्ष ध्येयापाशी आहे. ज्या मूळ गोष्टीकडे पहावयाचे त्याच गोष्टीकडे विचारपूर्वक लक्ष द्या. म्हणजे निर्लेप जे ब्रह्मस्वरुप त्याचे सुख अनुभवाल. प्रपंच अल्पसा वाटतो, पण तोच बंधाला कारण आहे. म्हणून जाणते व विचारी पुरुष त्यापासून दूर राहातात.दूधांत विषाचा थेंब पडला तर चतुर पुरुष ते दुध घेत नाही. तसेच षड्रस पक्वात्र खापरांत वाढले व त्याला कुत्र्याने स्पर्श केला तर याज्ञिक त्याला स्पर्श करीत नाही.शून्याची कल्पना यावी म्हणून ‘O’आकार दाखवितात म्हणून तेवढ्यावरुन शून्याचे माप करता येईल काय? सर्व आकार व उपाधिचा बाध करुन आम्ही आत्मस्वरुपच झालो. असे माऊली ज्ञानेश्वर सांगतात.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *