संत सोपानदेव चरित्र २५

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

भाग – २५.

अनुक्रमणिका


दुसर्‍या दिवशी भल्या पहाटेच विठ्ठलमंदिरांतुन ॐकार ध्वनी ऐकु येऊ लागला.वातावरनांत ॐनाद भरुन राहीला.लोकांची पावले आपसुकच मंदिराकडे वळली.मंदिराच्या गर्भगारांत निवृत्त,ज्ञानदेव,सोपान,मुक्ताई पद्मासन घालुन बसले होते.ध्वनींची स्पंदने वाढली जमलेले लोकं अनिमिष नेत्राने बघत होती.सारी आवर्तने,शांतीपाठ संपल्या वर पांडुरंगाला साष्टांग दंडवत घालुन चौघेही बाहेर येऊन जमलेल्या लोकांना नमस्कार केला.त्यांना उद्देशून ज्ञानदेव म्हणाले,हा सोपान किती नेमकं आणि सुंदर बोलतो ते ऐका,अनुभवा.तो आतां नमनस्तोस्र सांगेल.सोपानांनी निवृत्तींकडे पाहिलं,त्याच्या डोळ्यांत आदेश होता, विश्वास आणि अभिमानही! सोपानांनी विठुरायाला नमस्कार करुन पद्मासन घातले.समोर बसलेल्या श्रोतृवर्गाला वंदन करुन बोलायला सुरुवात केली.
निवृत्तीनाथांचा शिष्य,साक्षात ज्ञानसूर्याचा धाकटा बंधु सोपानदेव आपल्याला विनम्र वंदन करुन बोलायला सुरुवात करतो.डोळे मिटुन हळुवार आवाजांत सोपानांनी नमनस्तोस्रस सुरुवात केली.


“नमो ज्योतिर्मय ब्रम्हा।आनंद ईश्वर पुरातना।। अशी सुरुवात करुन शेवट ॐ शांतीः शांतीः शांतीः।। रामकृष्णहरी। रामकृष्णहरी।।नमनस्तोस्र पूर्ण झाला. रामकृष्णहरीचा गजर झाला.डोळे उघडुन बघीतले तर सर्व श्रोतृवर्गाचे डोळे मिटलेले,रामकृष्णहरीच्या गजरात तल्लीन झालेले,जणुं सगळ्यांची भाव समाधी लागली होती.त्यांनी निवृत्तीदादां कडे बघीतल्यावर त्यांच्या चेहर्‍यावर प्रसन्नता,समाधान,अपेक्षापुर्तीचा आनंद, धाकट्या भावाबद्दलच कौतुक,लाडक्या शिष्याबद्दलचा अभिमान,आपला शिष्य उत्तमरित्या कसोटीस उत्तमरित्या उतरल्याची पावती त्यांच्या डोळ्यांतून वाहणार्‍या अश्रूच्या प्रत्येक थेंबातुन दिसत होती.धन्यता कशाला म्हणतात, कृतार्थता म्हणजे काय,याची प्रसन्न जाणीव त्याक्षणी सोपानाला झाली. निवृत्तीदादांच्या शेजारी बसलेले ज्ञानदादा साक्षात ज्ञानसूर्य भासत होते. नामदेवांनी विठ्ठल गजर केला आणि लोक पांगले.


आतां सभामंडपात होते फक्त निवृत्ती,ज्ञानदेव,सोपान,मुक्ताबाईअणि नामदेव अर्थात या संगळ्यांचा साक्षीदार होता तो सावळा विठ्ठल!निवृत्तीदादांनी, सोपानांने रचलेल्या नमस्तोस्रात ज्या कांही क्षुल्लक चुका होत्या त्या दृष्टीस आणुन दिल्या.नमनस्तोस्र उत्तम रचल्या बद्दल कौतुक केले.
भागवतधर्माचं स्वरुप सर्व समावेशक असल्यामुळे त्याला सर्व व्यापक रुप देण्यासाठी सर्वदूर प्रचार व प्रसार होण्यासाठी दूरदूरच्या तिर्थस्थळां ना भेटी देऊन तिथे,त्या त्या ठीकाणी भागवत धर्माचा प्रसार करावा लागेल हे निवृत्तीनाथांनी सुचवल्यामुळे सर्वानाच आनंद झाला.तिर्थाटनाला जाण्याच्या योजनेला सर्वांनी संमती दिली.या चौघा भावंडाबरोबर नामदेव,गोरोबा,सावता ही संतमंडळी,गावातीलही कांही मंडळी जाणार होती.चार दिवसांनंतरचा मुहुर्त निघाला.मृत्युला मिठी मारुन केवळ ज्ञानदेवांच्या हस्तस्पर्शाने जिवंत झालेले सच्चिदानंदबाबा नेवाशाहुन त्यांच्या सोबत जाण्यासाठी आले.


तिर्थाटनाची तयारी पूर्ण झाल्यावर पंढरपूरहुन सर्व मंडळी आळंदीला आली. पैठणला जातांना वाटेत नेवासेला मोठा मुक्काम पडला.आणि तिथेच सर्व सामान्यांना समजेल अशा सोप्या मराठी भाषेत भगवद् गीतेच्या १८अध्यायातील ७०० ओव्यांवर आधारीत भावार्थ दीपिकेची मिरास सांभाळणारा ९१३४ ओव्यांची “ज्ञानेश्वरी” ग्रंथ ज्ञानेश्वरांनी तयार केला.या अविष्काराचे आपण साक्षीदार आहोत यानेच सोपानदेव रोमांचित झाले.ज्ञानेश्वरी लिहुन झाली आणि नेवासकरांचा भावपूर्ण निरोप घेऊन मंडळी पुढे निघाली.ज्ञानदेव जेव्हा चर्चेत,मनन चिंतनात गुंतलेले असले की, जमलेल्या श्रोतृवर्गाचे प्रबोधन करण्याची जबाबदारी सोपानावर यायची आणि मग त्यांच्याही प्रतिभेला बहर यायचा.


याच प्रवासात सोपानदेवांनीही हरीपाठांचे अभंग रचले.अवघं १४-१५ वर्षाचं कोवळं वय,पण पारमार्थिक ज्ञानानं ओसंडुन वाहणारे शब्द,कुणालाही समजेल अशी सोपी सरळ भाषा,असे सोपान खुलत,उमलत, फुलत होते.बघतां बघतां तिर्थाटन संपलं
ज्ञानदेवांनी आपल्या अलौकिक योग सामर्थ्याची साक्ष देत लोकांना आपलसं केलं होतं आणि सोपान प्रत्येक गोष्टीचं अवलोकन करत एकप्रकारे एकलव्या सारखं स्वयंशिक्षण,आत्माध्ययन सोपान करीत होते.


क्रमशः
संकलन व मिनाक्षी देशमुख.

अनुक्रमणिका

संत सोपानदेव महाराज संपूर्ण चरित्र


✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

2 Comments

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading