६ पितामहः भीष्म

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची

!!! भीष्म !!! भाग -६.

पुर्वजन्मी राजा शंतनु महाभिष नामक इक्ष्वाकु कुलभुषक होते. त्यांनी केलेल्या धर्मचारणानं आणि यज्ञांनी स्वर्गलोकी देवसभेत बसण्यास जागा मिळाली. तीथे अचानक गंगेन प्रवेश केला. तीच्या अनुपम सौंदर्याने दोघेही एकमेकांकडे आकृष्ट झाले. ब्रह्मदेवांना त्यांचे हे वर्तन विकारयुक्त वाटल्याने त्यांनी दोघांनाही भूतलावर जाण्याची आज्ञा दिली. ते म्हणाले, “ज्या भूमीचं वैशिष्ट्य विकार आहे त्या भूमीवर ते पुर्णतः भोगुन परत या.”

त्यावेळी ते ब्रह्मदेवाला म्हणाले, “विकार हे भूमीच वैशिष्ट्य नसुन मानवी देहाचं कारण आहे जे तुम्ही योजलेलं आहे.” असे म्हणुन शंतनू स्वतःचे क्षेत्र शोधार्थ निघाले. बरीच वर्षे लोटली. ययातीच्या कुळातील वंशज दुष्यंतपुत्र भरतांचे वंशज आणि या लोकीचे त्यांचे पिता पतीप गंगाकिनारी योगसाधना करीत असतांना गंगा त्यांचेसमोर जाऊन शंतनूबरोबर लग्न करण्याचा मानस व्यक्त केला. त्यांनी ती मान्य केली. गंगा भूलोकी निघाली असतां तीला अष्टवसूंनी भेटुन सांगीतले की, “वशिष्ठ मुनींचा उपमर्द केल्याने शापग्रस्त झालो आहोत.” अष्टवसूनांही कामना निर्माण झाली, पण स्वर्गलोकात कामनेला स्थान नसल्यामुळे ते भूलोकी आले. त्यांनी द्यू नावाच्या वसूला आपलं सर्व सामर्थ्य देऊन भूलोकी त्यांना नाममात्र जन्माला येण्यासाठी पाठवले, पण जन्म मानवाच्या गर्भातुन नको म्हणुन गंगेला प्रार्थना केली.

शंतनू गंगेच्या सौंदर्याने एवढे प्रभावित झाले की, तीने केलेल्या अटी त्यांनी बिनशर्त स्विकारल्या. तीने स्वतःच्या स्वातंत्र्याची मागणी करुन म्हटले की, कोणत्याही कृत्त्याबद्दल विचारायचे, हटकायचे नाही. ज्यावेळी उल्लंघन होईल त्या क्षणी आपल्या जीवनांतुन निघुन जाईन. त्याप्रमाणे त्यांनी कबुल केले. लग्न झाल्यावर सातही मुले तीने गंगेत अर्पण करतांना हताशपणे व दुःखाने पाहण्याशिवाय कांहीच करु शकत नव्हते. परंतु आठव्यावेळी राजपत्नी गंगा जेव्हा गर्भवती झाली तेव्हा लोकक्षोम, आणि प्रिय पत्नीचा, सम्राज्ञीचा प्रजाजनांकडुन अवमान होण्यापेक्षा स्वतःच जाब विचारायचे ठरवुन आठव्या मुलाच्या वधापासुन अडवलं. झालं! ठरल्याप्रमाणे गंगा त्यांना जातांना वात्सल्यभरल्या नजरेनं पाहत म्हणाली, “हा बाळ फार लहान आहे, त्याचे योग्य संगोपन करुन योग्य वेळी परत करीन.”

लोकक्षोभ व झालेल्या घटना आणि गंगेचा विरह यातुन सुटण्यासाठी शंतनु यमुने किनारी हस्तीनापुरला कुरुंची राजधानी करुन जीवन व्यतीत करु लागले.

एक दिवस शंतनू मृगाची शिकार करीत असतांना जखमी मृगाच्या मागे जातांना ते भागीरथीच्या पात्रात मध्यभागी उभे राहिले असतां भागीरथीचा जलप्रवाह एकदम रोडावलेला दिसला म्हणुन आश्चर्याने भांबावुन चहुबाजुने पाहत असतांना त्यांना दिव्यज्योतयुक्त बालक आपल्या बाणांनी नदीवर बांध बांधीत असलेला दिसला. त्या बालकाचे डोळे पाहुन त्यांना गंगेची आठवण झाली. मनात म्हणाले, “गंगे! वियोगाचे दूःख विसरण्यासाठी असा रानावनात भटकत असतो. तू सातही मुलांना तुझ्याच जलात बुडविले. आठव्याला सोबत नेलेस. तुझा जलप्रवाह थांबवणे फक्त कैलासपती आणि दुसरा हा तुझा पुत्रच असु शकतो.” त्याचवेळी जलप्रवाहातुन त्या बालकाचे बोट धरुन गंगा प्रगटली.

क्रमशः

संकलन – मिनाक्षी देशमुख

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची

भगवान श्रीकृष्ण
श्रीहरी
भगवान विष्णू
महालक्ष्मी
नारायण
वैकुंठ
पांडव
कौरव
धनंजय महाराज मोरे
dhananjay maharaj more
pune
mumbai
संत
वारकरी संत
संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
निवृत्तीनाथ महाराज सार्थ अभंग गाथा
सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर महाराज सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर महाराज अभंग गाथा
ज्ञानेश्वर महाराज अभंग गाथा
ज्ञानेश्वर महाराज सार्थ अभंग गाथा
संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
ई-संपादक
धनंजय विश्वासराव मोरे
(B.A./D.J./D.I.T.)
आवृती पहिली दिनांक : २६/०९/२०१५
मु. मंगलवाडी पोस्ट. भर ता. रिसोड जिल्हा वाशिम ४४४५०६

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading