५ पितामहः भीष्म

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची

!!! भीष्म !!! भाग -५.

लग्नानंतर थोड्याच दिवसांनी क्षयरोगाने आजारी पडुन विचित्रविर्याचा निपुत्रीक मृत्यु झाला. कुरुवंशाच्या नाशाचा प्रश्न उपस्थीत झाला. भीष्मांनी इच्छीले असते तर ते सहज राजगादीवर बसु शकले असते. वंशरक्षणासाठी लग्न करण्यांत कोणतीच अडचण नव्हती. पण मोठ्यात मोठे प्रलोभन किंवा गरज त्यांना आपल्या प्रतिज्ञेपासुन विचलीत करु शकत नव्हतं. सत्यवतीच्या पित्याला दिलेल्या वचनानुसार, त्रैलोक्याचे राज्य, ब्रम्हपद एवढेच नव्हे तर मोक्षाचाही त्याग करु शकतात. पण सत्याचा त्याग करु शकत नाही. पंचमहाभूते आपला धर्म सोडतील, चंद्र शीतलतेचा त्याग करील, धर्मराज धर्म सोडतील पण भीष्म सत्य प्रतिज्ञा सोडण्याचा विचार सुध्दा करुं शकत नाही. प्रतिज्ञा पालन असावे तर असे!

इकडे अंबा फिरत फिरत एका सरोवराकाठी पोहोचली. ही भुमी म्हणजे दोन राज्यांच्या मधलं अरण्य होतं. तीथे तीला वृध्द जेष्ठ तिपस भेटले. ती त्यांना तपश्चर्येबद्दल माहिती विचारत असतांना तीचे पितामह होत्रवाहनान आले. तिची कर्मकहाणी ऐकल्यावर त्यांचा अतीव दुःख व संतापाने त्यांचा संयम सुटला. त्यांच्या सल्ल्यानुसार जमदाग्निनंदन परशुरामांना शरण गेली. भीष्मांनी परशुरामांकडुन अस्रविद्या घेतली होती. गुरु या नात्याने त्यांनी भीष्माला बोलावुन अंबाला स्पर्ष करुन कलंकीत केले असल्यामुळे तिच्याशी विधिवत लग्न करण्यास सांगीतल्यावर, भीष्म म्हणाले ज्या स्रीने दुसर्‍यावर प्रेम केले तिला कोणताही धार्मिक पुरुष कसा ठेवु शकेल ? यावर परशुराम क्रोधीत होऊन म्हणाले एकवीस वेळा पृथ्वी निःक्षत्रीय केली. त्यांनी भीष्मांना युध्दासाठी ललकारले.

गुरु शिष्यांत सतत तेवीस दिवस भयंकर युध्द झाले. परशुरामांजवळ विश्वातील सर्वच अस्रविद्या असुनसुध्दा देव आणि ऋषींनी युध्द थांबवण्यासाठी मध्यस्थी केल्यामुळे भीष्मांनी पारवास्राचा प्रयोग केला तेव्हा हे अस्र अज्ञात आहे असं दाखवुन युध्द संपविले. भीष्मांनी त्यांचे गुरु परशुरामाचे न ऐकता सत्याचे रक्षण केले आणि अद्भुत पराक्रमाने परशुरामासारख्या अद्वितिय धनुर्धरालाही ‘त्राही भगवान’ केले. सत्य, प्रतिज्ञा आणि वीरतेची पराकाष्ठा झाली.

अंबा तीच्या प्रतिशोधासाठी निघाली. भगवान परशुरामांचा पराभव करणारा श्रेष्ठ क्षत्रियवीर असा लौकीक प्राप्त झालेले भीष्म पराभूत मनोवृत्तीने हस्तीनापुरी परतले. परशुरामांना भिडायला गेलेले भीष्म सुखरुप परत येईपर्यंत सर्वच काळजीत होते. सुखरुप परत आल्यामुळे त्यांचे अभुतपुर्व विशाल स्वागत केले. भीष्मांना हा उपचार नको होता. इथे जयपराजयाची गोष्टच नव्हती !

कुणीही विजयी नव्हतं ! कुणीही जिंकलं नव्हतं! उलट संस्कृती पराजीत झाली होती. परंपरा अपमानीत झाली होती. राष्टधर्म व्यथीत झाला होता.

भीष्म त्यांच्या व्यक्तीधर्माशी प्रामाणिक होते. परशुराम त्यांच्या समष्टीधर्मांचं पालन करीत होते आणि अंबा ? अंबा विकारग्रस्त होती. ती सृष्टीरचैत्याला विध्वंस करायला भाग पाडत होती.

या सर्व प्रकाराने उद्गिन्न झालेलं मन शांत करण्यासाठी अतिपुर्वेला जान्हवी सागराला मिळते तीथे जायला निघाले.

क्रमशः संकलन – मिनाक्षी देशमुख

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची

भगवान श्रीकृष्ण
श्रीहरी
भगवान विष्णू
महालक्ष्मी
नारायण
वैकुंठ
पांडव
कौरव
धनंजय महाराज मोरे
dhananjay maharaj more
pune
mumbai
संत
वारकरी संत
संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
निवृत्तीनाथ महाराज सार्थ अभंग गाथा
सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर महाराज सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर महाराज अभंग गाथा
ज्ञानेश्वर महाराज अभंग गाथा
ज्ञानेश्वर महाराज सार्थ अभंग गाथा
संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
ई-संपादक
धनंजय विश्वासराव मोरे
(B.A./D.J./D.I.T.)
आवृती पहिली दिनांक : २६/०९/२०१५
मु. मंगलवाडी पोस्ट. भर ता. रिसोड जिल्हा वाशिम ४४४५०६

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading