!!! भीष्म !!! भाग -१५.
राजसूय यज्ञ यथासांग पार पडला. पांडवांचे वैभव पाहुन दुर्योधन द्वेषाने, असुयेने पेटुन उठला. मामा शकुनीच्या सल्ल्याने इच्छेविरुध्द राजाज्ञा म्हणुन विदुराहस्ते युधीष्ठीराला द्युत खेळण्यास आमंत्रीत केले.
धृतराष्टासह दुर्योधन, कर्ण, शकुनी यांनी हेतु गुप्त ठेवून द्युत खेळण्यास आरंभ केला. शकुनी जवळचे फासे जरासंधांच्या हाडापासुन बनविले असल्यामुळे व हुकमी असल्याने तो प्रत्येक डाव जिंकत गेला. युधीष्ठीर प्रत्येक हरत्या डावावर, राज्य, सैन्य, बंधु, स्वतः व शेवटी द्रौपदी सर्व हरवुन बसला. पांडव प्रत्येक डावागणिक नग्न होत होते.
धृतराष्टांना सत्यर्म कळत होता, पण कुरुंच्या सभेत धर्म तुडवला जात होता. संस्कृतीवर मृत्युचं सावट येत होतं. ज्या राजसभेवर भीष्मांनी पुर्ण आयुष्य पणाला लावलं, प्रतिज्ञाबध्द होऊन कुरुराज्याचं भलं केलं त्याच भीष्मांच्या समोर द्रौपदीची विटंबना उघड्या डोळ्यांनी पाहतांना त्यांना किती क्लेश, कीती घालमेल होत असेल ही कल्पनाच करवत नाही. ते सिंहासनाच्या आज्ञेने बांधील होते. शेवटी द्रौपदीच्या करुन आर्त हाकेने श्रीकृष्णाने तीचे लज्जारक्षण केले.
विदुरांनी धृतराष्टाची कान उघाडणी केल्यावर द्रौपदीला वर मागायला सांगीतल्यावर तीने फक्त दास्यातुन पतींची मुक्तता मागीतली पण उदार होऊन धृतराष्टाने पांडवांचे राज्य, संपती सर्व परत करुन इंद्रप्रस्थास जाण्याची अनुमती दिली.
भीष्मांच्या कक्षाचे दार बंद होते. कुरुंच दैदिप्यमान निशाण अविरत फडकत राखण्याची विजिगीषा बाळगणारा थोर सेनानी हतबध्द झाला होता. हस्तीनापुर राज्यात शत्रुदेशाची मुंगीही प्रवेश करुं शकणार नाही असा दरारा असलेला वीर आपल्या सुनेचं वस्रहरण होत असतांना उघड्या डोळ्यांनी पाहत स्वस्थ बसले होते. धिक्कार असो या शस्रविद्येचा ! खचितच या भूमीतलं पावित्र्य संपलय म्हणुन कां अशी दुर्बुध्दी झाली ? कां वानप्रस्थ स्विकारले नाही ? कां कर्णाचा वध केला नाही ? कां दुर्योधन, शकुनी, दुशाःसनावर शस्र उचलले नाही ? कुठला धर्म पाळला भीष्मांनी ? त्यांना अगदी भडभडुन आलं ! प्रदिर्घ जीवनाची घृणा वाटु लागली.
ज्या राज्यातील स्रीच्या निरीला परपुरुषाचा हात लागतो आणि त्याला शासन होत नाही, प्रजा मुग गिळुन बसते, तेव्हा तिथली संस्कृति नागवी होते. ते क्षोमग्रस्त होऊन संताप संताप होत होता.
पांडवपुत्र द्रौपदीसह इंद्रप्रस्थाला निघाले असतां अर्ध्या वाटेवरच युधीष्ठीराला पुनः द्यूत खेळण्याचे निमंत्रण मिळाल्याने परत युधीष्ठीर द्यूतामधे सर्व हरला. बारा वर्षे वनवास आणि एक वर्ष अज्ञातवास पत्करावा लागला. सर्व पांडव काम्यकवनात वस्तीला राहिले.
पांडव वनात जाऊन दोन मास होत आले. भीष्मांनी स्वतःला कक्षात कोंडुन घेतले. हस्तीनापुरचे सर्व व्यवहार नियमीत सुरु होते पण यंत्रवत. भीष्म कुणालाही भेटत नव्हते. दुध, फलाहारावर जीवन व्यतीत करीत होते. वनामधे महर्षी व्यास, धौम्यऋषी पांडवांशी पुढील भविष्याच्या युध्दाची सांग्रत चर्चा सुरु होती. दुर्योधन युध्दाची करीत असलेल्या तयारी बद्दल बोलतांना व्यास म्हणाले, “पृथ्वीच्या प्राप्तीस्तव हवी विक्रमांची रास ! आपुल्या पराक्रमे झाकावी विपक्षाची आस ! अत्यंत प्रकर्षाने वाढता वाढता वाढे बळां ! श्रेष्ठ तंत्रानेही रणीं, उतरे विजयमाळा !”
क्रमशः
संकलन – मिनाक्षी देशमुख.
भगवान श्रीकृष्ण
श्रीहरी
भगवान विष्णू
महालक्ष्मी
नारायण
वैकुंठ
पांडव
कौरव
धनंजय महाराज मोरे
dhananjay maharaj more
pune
mumbai
संत
वारकरी संत
संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
निवृत्तीनाथ महाराज सार्थ अभंग गाथा
सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर महाराज सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर महाराज अभंग गाथा
ज्ञानेश्वर महाराज अभंग गाथा
ज्ञानेश्वर महाराज सार्थ अभंग गाथा
संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
ई-संपादक
धनंजय विश्वासराव मोरे
(B.A./D.J./D.I.T.)
आवृती पहिली दिनांक : २६/०९/२०१५
मु. मंगलवाडी पोस्ट. भर ता. रिसोड जिल्हा वाशिम ४४४५०६
