भाग क्र.13
सत्यप्रेमी पुरोहित
चैत्र शु.2 सोमवार (19 मार्च 2018)
सर्व वेदवेत्या गुरुजनांना वंदन करुन वाल्निकी रामायणातले संस्कृती दर्शन पाहु.अयोध्याकांडापासुन आपण हे अभ्यासतो आहे.रामचंद्रांनी लक्ष्मण व सीतेसह वनात जाण्याची तयारी केली त्याच समयी त्यांनी सर्व मौल्यवान वस्त्र अलंकार दागीने यांचे दान केले हि दानसंस्कृती आपण गेल्या भागात पाहिली.
त्यानंतर दशरथ राजा व तिन्हि मातांचा निरोप व आशीर्वाद घेण्याकरता राम सीता व लक्ष्मण महालात आले.दशरथ राजे तर सर्व संपत्ती सैन्य त्यांना वनात ने असा अाग्रह करत होते रामांनी ते नाकारले व वल्कले धारण केली व त्याच समयी सीता रेशमी वस्त्रे त्यागुन वल्कले परीधान करु लागली हे पाहिल्यावर राजमहालातील अन्य स्त्रीया रामचंद्रांची समजुत घालु लागल्या व सर्वजण शोकमग्न झाले
मात्र त्याच समयी कुलगुरु वसिष्ठांच्या डोऴ्यात पाणी आले त्यांनी गंभीरपणे सीते ला थांबवले प्रचंड संतापाने ते कैकयीला म्हणतात
अतिप्रवृत्ते दुर्मेधे कैकेयि कुलपांसनि।
वञ्चयित्वा तु राजानं न प्रमाणेऽवतिष्ठसि।। (37.22)
मर्यादा उल्लंघुन अधर्माकडे पाउल टाकणारी दुष्ट कैकयी तु केकय राजाच्या कुऴाचा कलंक आहेस तु राजाला धोका देवुन देखील तुझी मर्यादा सीमा ओलंडते आहेस.
न गतव्यं वनं देव्या सीतया शीलवर्जिते ।
अनुष्ठास्यति रामस्य सीता प्रकृतमानसम् ।। 23
शीलाचा परीत्याग केलेल्या दुष्ट कैकयी तु नीट ऐक सीता देवी वनात जाणार नाहित.तर रामाकरता प्रस्तुत सिंहासनावरच त्या बसतील
आत्मा हि दारा:सर्वेषां दारसंग्रहवर्तिनाम् ।
आत्मेयमिति रामस्य पालयिष्यति मेदिनीम् ।। 24
प्रत्येक गृहस्थाची पत्नी हि त्याची अर्धांगिनीच आहे त्यामुऴे देवी सीता हि देखील रामांचा आत्माच आहे त्यामुऴे राम वनात गेले तरी त्या सिंहासनावर देवी सीताच राज्यपालन करतील.
आपण आज संस्कृतीदर्शनासोबतच अनेक आक्षेपांचे खंडनहि करणार आहोत
सर्व प्रथम पुरोहित, उपाध्याय व आचार्य वेदपारंगत या शब्दांच्या व्याख्या पाहु
मीमांसते च यो वेदान् षड्भिरङ्गै:सविस्तरै:।
इतिहास पुराणानि स भवेद्वेदपारगा:।। (व्यासस्मृति 4 -45)
जो ब्राह्मण षडंगासहित वेद वेदांग (उपग्रंथ) इतिहास व पुराणे यांचा सविस्तर विचार करतो ज्याचा या बाबत सखोल अभ्यास आहे तो वेदपारंगत जाणावा.
मनुस्मृतित 2 अध्यायात काय म्हटलय ते पाहा
उपनीयं तु य:शिष्यं वेदमध्यापयेद्विज:।
सकल्पं सरहस्यं च तमाचार्यं प्रचक्षते ।।
जो ब्राह्मण शिष्याची मुंज लावुन त्याला यज्ञविधि व उपनिषदांसह वेद शिकवतो तो आचार्य जाणावा
एकदेशं तु वेदस्य वेदाङ्गान्यपि वा पुन:। यो ऽध्यापयति वृत्यर्थं उपाध्याय: स उच्यते ।।
जो ब्राह्मण शिष्याला उपजीविकेकरता वेदाचा एकदेश म्हणजे संहिता किंवा उपग्रंथ शिकवतो तो उपाध्याय जाणावा
निषेकादीनि कर्माणि य:करोति यथाविधि ।
संभावयति चान्नेन स विप्रो गुरुरुच्यते ।।
जो ब्राह्मण शिष्यांना गर्भाधानादि संस्कार विधिपूर्वक करुन विद्यार्थ्यांना अन्नाची सोय करतो तो गुरु जाणावा
हल्ली बरेचदा आपल्या अज्ञानामुऴे आपण कोणालाहि कोणतीहि पदवी देवुन मोकळे होतो.
पुरोहित या शब्दाची व्याख्या पुर:हित: म्हणजे जो यजमानांचे हित जाणतो त्यांची प्रगती व्हावी हि कामना करतो तो पुरोहित जाणावा.
जसा कुटुंबाकरता “फँमिली डॉक्टर “किंवा “घरचा वैद्य हि संकल्पना आवश्यक आहे तसच आस्तिक व श्रध्दावान व्यक्तिला पुरोहित हा आवश्यक आहे.
फँमिली डॉक्टरला ज्या प्रमाणे त्या कुटुंबाची कौटुंबिक, आर्थीक स्थिती ज्ञात असते व अनुवांशिक आजार व त्या कुटुंबाची दिनचर्या व व्यवहार माहित असतात त्यामुऴे आजाराचे योग्य निदान करणे व त्यांना सुयोग्य व परवडतील असे उपचार देणे सोपे जाते.
तसच आपल्या कुटुंबाकरता योग्य व्यक्ति पुरोहित म्हणुन नियुक्त करणे हि संस्कृती आहे.
परंपरेने देखील हि पध्दत सुरु आहे .
आजहि अनेक महत्वाच्या निर्णयात पुरोहिंतांचे मत जाणुन घेतले जाते. मी स्वत:पुरोहित अाहे त्यामुऴे हा अनुभव आहे.
एक उदा.देतो. अनेक यजमान सांगतात गुरुजी मुलाचे /मुलीचे लग्न करायचे आहे तुमच्या माहितीतले सुयोग्य स्थळ सुचवा.किंवा गुरुजी हि जागा खरेदि करु कि नको. किंवा काहि प्रसंगात तर तुम्हि मुलाला समजवा किंवा मुलगा सुनबाईंना चार गोष्टि सांगा वगैरे वगैरे.
हि संस्कृती वेदकाऴापासुन सुरु आहे “वयं राष्ट्रे जागृयाम पुरोहिता:”अस कृ.यजुर्वेदात म्हटलय ते उगीच नाहि.
(आम्हि राष्ट्रातले सदैव जागृत पुरोहित असु)
या ठिकाणी वसिष्ठ जे शांत तपस्वी म्हणुन ओऴखले जातात ते चिडले आहेत व प्रत्यक्ष राजासमोर त्याच्या प्रिय पत्नीचा (कैकयी) ते धिक्कार करत अाहेत व सीतेने वनात जाणे व वल्कले परीधान करणे यास विरोध करत आहेत. (आपली हिंमत तरी एवढि होईल का? हा मनाशी प्रश्न करा) कैकयी तुझ वर्तन अयोग्य आहे हे साम्राज्याच्या राणीला ठणकावुन सांगणे म्हणजे मृत्युलाच निमंत्रण आहे. (जी कैकयी पुत्रप्रेमाने अंध आहे व राज्याभिषेकाची सर्व तयारी झाली असताना रामांना वनवासात धाडतेय ती कैकयी वसिष्ठांना कोणतेहि शासन देवु शकली असती) पण वसिष्ठ कुलगुरु सत्यप्रेमी आहेत.
माझ ते खर अस त्यांचे वागणे नसुन खर तेच माझ हा त्यांचा बाणा आहे
असाच बाणा रामशास्त्री प्रभुणेंनी राघोबादादाच्या प्रसंगात दाखवला होता.
भागवतपुराणात वेन राजाची कथा हि अशीच आहे.
अनेक उदारणे या विषयात देण्यासारखी आहेत पण लेखन मर्यादा देखील आहे.
वसिष्ठांनी ठामपणे सीतेच्या वनवासाला विरोध केलाय व त्यांनी सीतेला राज्यकारभार सोपवा अस ठणकवलय कारण सीता हि राज्यकारभारात पारंगत होती ती राज्यशास्त्र निपुण होती. हे देखील वसिष्ठ जाणत होते कारण ते अनेक पिढ्यांपासुन रघुकुलाचे कुलगुरु होते त्यामुऴे कोण व्यक्ति कोणत्या क्षेत्रात पारंगत आहे याची जाण त्यांना होती त्यामुऴे त्यांनी उत्तराधिकारी , भरत शत्रुघ्न यातला न निवडता सीतेलाच पसंती दिली
सहज ओघात आल म्हणुन सांगतो आपल्याकडे अनेक स्त्रीयांनी देखील खंबीरपणे राज्य चालवले आहे व त्याहि सिंहासनाच्या अधिकारी ठरु शकतात हेहि लक्षात घ्यावे. बरेचदा पुरुषप्रधान संस्कृती च्या नावाने पोकळ बोंब मारणार्या मंडऴींना हे दाखले दाखवणे हि आपली जवाबदारी आहे. राजमाता जिजाबाई, महाराणी ताराबाई, पुण्यश्लोक अहिल्याबाई होऴकर, झाशीची राणी यांची उदारणे समोर आहेत या सर्वांनी कारभार केला आहे
कुलगुरु व राजघराणे हि संस्कृती देवतांचे गुरु बृहस्पति (देवगुरु)यांच्यापासुन सुरु झाली
महाभारतात कृष्ण बलरामांचे कुलगुरु गर्गाचार्य होते. (सुभद्राहरण वगैरे प्रसंगात त्यांच्या मताचा आदर करण्यात आला होता)
आर्य चाणक्य चंद्रगुप्त मौर्य (यांनी तर भारतातली जुलमी राजवट पालथी घातली होती व प्रजाहित दक्ष राज्य स्थापले अगदि सिकंदरा सारख्या परकिय आक्रमकांसमोर हि न झुकता यांनी देशाचे रक्षण केले)
विद्यारण्यस्वामी हरिहर बुक्कराय (हंपीचे राज्य उभारले)
अशा अनेक कुलगुरु व राजांच्या जोड्यांनी देखील हिच संस्कृती जपली व आपले राज्य सुजलाम् सुफलाम् बनवले.
तुर्त लेखन मर्यादा
वे.भूषण दिगंबर जोशी वेंगुर्ले
