संत सोपानदेव चरित्र १३

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

भाग – १३.

अनुक्रमणिका

कावेरीआक्का व द्वारकामाईच्या हातास धरुन मुक्ताईने त्यांना घरात आणले.माई म्हणाल्या सोपाना! सकाळी चुकुन आंबलेला भात घातल्या गेला. बाळानो!क्षमा करा.आतां मी ताजा भात करुन आणला.तो तुम्ही खाल्ला तर माझ्या मनाची बोच कमी होईल आणि भाताची तपेली समोर केली.सर्वांचीच स्थिती अवघडल्यासारखी झाली.सोपान तर गांगरुन गेले.कारण दुपारी एकवेळ जेवण झाले की,रात्री फक्त कोरडा फराळ खात असे.पांचच घरी भिक्षा मागुन जेवढं मिळेल तेवढ्यावरच भागवायचं असं या भावंडांनी ठरवलं असल्यामुळे,आणलेला भात कसा खायचा?हा भात खाल्ला तर सहाव्या घरची भिक्षा खाल्ल्यासारखं होईल.माईं ना अतिशय वाटल्याने त्यांना आलेला हुंदका आवरतां आला नाही.कावेरी आक्कांंना राहवलं नाही.गहिवरल्या आवाजात म्हणाल्या,ज्ञानेशा!माणसा पेक्षा तत्व मोठी असतात कां रे?मातृत्वा
पेक्षा संकल्प आणि नियम मोठे असतात कां रे?ही तत्वे जेव्हा माणसांपेक्षा मोठी होतात तेव्हा…
नाही आक्का! जगात मातृत्वाला कोणतंच आव्हान,कोणतेच यमनियम लागु नाहीत,कारण माणसांपेक्षा तत्व मोठी झाली,मातृत्वापेक्षा नियम मोठे झाले की,काय घडते,त्याचा परिणाम आम्ही भोगतो आहोत.मुक्ते!मांड पर्णावली!माई स्वहस्ते आपल्याला वाढणार आहे.निवृत्ती निग्रहाने म्हणाले. चौघेही भावंडे उनउन भातावर तुप टाकुन खात असलेले पाहुन आक्का व माईंना परमानंद झाला.


या प्रसंगाने सोपान आतांपर्यंत अजान,लहान आहे असं निवृत्ती ज्ञानदेव समजत होते ती दृष्टीच बदलली.कांहीस अबोल असलेले सोपानाची ज्ञानधारणा, समजावुन सांगण्याची हातोटी,संयम, समंजसपणा,प्रगल्भता,हुशारी,बुध्दी वैभवता पाहुन थक्क झाले.त्यांची आत्मिक उंची,आध्यात्मिक खोली, मनस्वी रुंदीचा प्रत्यय आला.झोपडीच्या बाजुस असलेल्या उंबराच्या झाडखाली आज तिघही भावंड एकमेकांच्या कुशीत विसावले होते.मुक्ताला जाग आल्यावर तिला काय दिसले? साक्षात ब्रम्हा विष्णु महेश च्या रुपात तिन्ही भाऊ दिसले.ती एकदम उठुन निवृत्तींच्या मांडीवर कोसळुन रडुं लागली.म्हणाली,तुम्ही कोणीच न दिसल्यामुळे मला वाटले,तुम्ही पण आईबाबांसारखे मला सोडुन गेलांत की,काय?सोपान तीचे अश्रू पुसत समजावत म्हणाले,तुला सांगीतल्या शिवाय आम्ही कुणीही कुठेच जाणार नाही.ज्ञानदेव म्हणाले,आईबाबा आपल्या ला न सांगता गेलेत,कारण त्यांना प्रायश्चित घ्यायचे होते.पण मुक्ते!आपण जेव्हा देवाकडे जाऊं तेव्हा,ताठ मानेनं, अभिमानानं मिरवत जाऊ.आपण जाऊं तेव्हा अभिजनच नव्हे तर अवघी चराचर सृष्टी अश्रू गाळेल.


दुपारची जेवणं झाल्यावर,तिघेही भाऊ अंगणातल्या शेवग्याच्या झाडा खाली बसले.निवृत्तींनी सोपानाला जवळ घेत म्हणाले,सोपाना!तूं गुरुपोदेश घेण्या इतका जाणता झालास,तेव्हा तुझ्या योग्यतेचा कोणी गुरु असल्यास सांग!झटकण सोपान उठुन निवृत्तींचे पाय धरत म्हणाले,दादा! मला असं दूर नको रे लोटुस!ज्ञानदादाला जसा गुरुगंडा बाधला तसाच मलाही बांध!आतांपर्यंत पिता होऊन सांभाळलेस,आतां गुरु होऊन मार्गदर्शन कर!सोपाना तुझ्यासारखा शिष्य मिळाला तर मला आनंदच वाटेल पण मी नाथपंथी!हा पंथ इतर पंथापेक्षा थोडा अवघड आहे.तत्वांचं काटेकोरपणे पालन करावं लागतं.
सोपान म्हणाले,दादा!तूं जेव्हा दीक्षा घेतली त्यावेळी तू पण लहानच होता की, तुझ्यासारखा निष्ठावान एकलव्यासारखा शिष्य लाभणे माझे अहोभाग्यच!उद्या सकाळी ब्रम्हमुहुर्तावर शिष्य करुन घेतो. असे म्हणुन सोपानाच्या मस्तकावर निवृत्तींनी हात ठेवला.आतांपर्यत चुप असलेली मुक्ता म्हणाली,निवृत्तीदादा! ही दोघं तुझे डोळे आहेत तर मी कोण? तूं आमच्या तिघांचे नाक आहेस.
उद्या रात्री निवृत्तीदादा आपल्याला शिष्य करुन घेणार या आनंदात निजलेल्या सोपानांना मध्यरात्री जाग आली.देवासमोरच्या शांत तेवत असलेल्या अंधुक प्रकाशांत झोपडीतील गुढ वातावरण निर्माण झालं होतं.


क्रमशः
संकलन व मिनाक्षी देशमुख.

अनुक्रमणिका

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

2 Comments

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading