भगवान श्रीकृष्ण चरित्र भाग ३, (११ ते १५)

"तैसी देशचि वाट न पाहतां।वयतेचिया गावा न जाता।बाळपणीच सर्वज्ञाता। वरी तयाते ।।" असे ज्यांच्याबद्दल म्हटले जाते अशी ज्ञानेश्वरांसहित चार भावंडे निंदा अडी अडचणीं,उपेक्षा,बहिष्कृत इत्यादी गोष्टी वाट्याला येऊनही,जराही विचलित न होता आत्मसामर्थ्याच्या प्रकाशात वाट चाल करणारी,स्वतः तरुन विश्व तारणारी ही भावंडे एका अलौकीक प्रभेने तेजाळलेली दिसतात

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇


कालगणनेनुसार ५१७३ वर्षापुर्वी द्वापार युगाच्या शेवटच्या पर्वात घडलेली ही चरित्रकथा, इतिहास..! त्यादिवशी यमुनाकिनारी वसलेल्या मथुरा नगरीतील भोजराज कंसाची लाडकी चुलत बहिण देवकीच्या विवाहाची पुर्वतयारीची मोठीच धामधुम सुरु होती. कंसराजवाड्याच्या विस्तिर्ण प्रांगणात भव्य विवाहमंडप उभारला होता. निमंत्रीत पाहुण्यांसाठी व आप्तांसाठी सोईयुक्त वसतीस्थाने बांधण्यात आली होती.

हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.

This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.

 !!भगवान श्रीकृष्ण चरित्र !!

!!! श्रीकृष्ण !!! भाग -११.

कृष्णाच्या पराक्रमी लिला कंसाला समजल्याने त्याच्या उरात धडकी भरली, क्षणभर सुन्न झाला.स्वभावानुसार त्याचा क्रोधाग्नी भडकला.स्वभावाने गरीब अस ल्याचे ढोंग करणार्‍या वसुदेवाचा वध करण्यापेक्षा भरसभेत त्याची छीःथू केल्यास सज्जनांना अपमान मृत्युसमान असतो. दोन दिवसांनंतर त्याने चापलुस सरदारां सह सभा भरवली,बंदिस्त पिता उग्रसेन ला ही सभेत आणवले.सर्व जमा झाल्या वर शक्य तेवढ्या सौम्य भाषेत कंसाने बोलण्यास सुरुवात केली.वृंदावनांत कृष्ण नांवाचा नंदपुत्र,माझ्या मुळावर घाव घालण्यासाठी रोजच्या रोज एका पेक्षा एक अलौकिक कृत्ये करणार्‍या शत्रुचे निर्दालन कसे करावे सुचत नाही. त्याच्या दैवी कृत्यांवरुन तो कोण आहे? कळत नाही.

अगदी तान्हा असतांना पुतना राक्षसीनेचे स्तनपान करुन तिचे प्राण शोषुन घेतले.यमुनेच्या डोहातील कालिया सर्पाचे दमन करुन त्याला डोह सोडण्या स भाग पाडले.धेनुक राक्षसाला ठार केले युध्दात देवादिकांनाही अजिंंक्य असले ल्या प्रलंब राक्षसाला एकाच मुष्टीप्रहाराने यमसदनाची वाट दाखवली.एवढेच नव्हे तर नेहमी होणारा इंद्राचा उत्सव बंद केला.चिडलेल्या इंद्राने सतत सात दिवस पर्जन्यवृष्टी केली तर या प्रतापी बालकाने सतत सात दिवस गोवर्धन पर्वतच छत्री सारखा उचलुन धरुन सर्वाचे रक्षण करुन इंद्राचे पारिपत्य केले.अगदी अलिकडे बैलाच्या रुपातील बलवान अरिष्ट राक्षसा चे शिंगे उपटुन त्याच्याच शिंगानी त्याला ठार मारले.वरवर पाहतां साध्या गोप रुपात वावरुन बासरीच्या सूरांद्वारे व्रज वासियांचे

मनोरंजन करतो,पण हा आपले खरे स्वरुप गुप्त ठेवुन,नक्कीच वेगळाच कुणीतरी आहे.आणि हे सर्व स्वभावाने गरीब भासवणार्‍या वसुदेवा च्या चिथावणीने होत असावे अशी शंका आहे.कंसाने भरसभेत वसुदेवाची जेवढी करतां येईल तेवढी निंदा नालस्ती करुन वसुदेवास म्हणाला, अरे मुर्खा! कंसाचा नाश करुन तुझा मुलगा मथुरेचा राजा होईल असे स्वप्न बघत असशील तर कधीच शक्य नाही.थांब! आतां तुझ्या दोन्ही पुत्रांची तुझ्या डोळ्यादेखतच वाट लावतो.आजपर्यंत मी कोणाही वृध्द,स्री ब्राम्हण किंवा नातेवाईकाची हत्या केली नाही.अरे! माझ्या पित्याचे तुझ्यावर किती उपकार आहेत. अरे तू यादवांचा मुळ पुरुष असुन चक्रवर्ती राजांच्या महा विख्यात कुलांमधे तुझी किर्ती होती. सज्जन तुला गुरुठीकाणी मानीत,पण तुझ्या कृत्यांमुळे सर्व यादवांच्या तोंडाला काळे फासलेस.आतां कृष्ण किंवा मी.. आमच्यामधे कधीही न विझणारा वैरागी चेतला असलेल्याने दोघांपैकी कुणा एका ची आहुती पडल्याशिवाय यादवकुल शांत होणार नाही.

तटस्थ झालेल्या सभे वर एक नजर टाकुन,अक्रुराला दोघांनाही धनुर्मुख यज्ञासाठी त्या दोघांनाही घेऊन येण्याची आज्ञा दिली.कंसाचे बोलणे संपल्यावर वयोवृध्द सर्वमान्य अंधक नांवाच्या तेजस्वी यादवाने निर्भय उच्च स्वरांत कंसाचा धिक्कार करीत म्हणाला, अरे कंसा!वसुदेवाचे सातही पुत्र,कारण नसतांना मारण्याचे क्रूर कर्म केलेस. तुझ्या या अमानुष राक्षसी कृत्यापासुन आपले प्राण खर्ची घालुन पुत्राचे प्राण रक्षण केले.तुझ्या पित्याने जन्मतःच तुला मारुन टाकले नाही त्याचा परिणाम तो भोगतो आहे.

तुझ्या पित्याने व वसुदेवाने आपले पितृ कर्तव्य केले,तूं मात्र कुलनाश क उत्पन्न झालास.अरे अलिकडे नाना प्रकारचे अपशकुन होऊ लागलेत यावरुन लवकरच नाश होईल असे स्पष्ट दिसत आहे.तुला जर भावी अनर्थ टाळायचा असेल तर,आता इथे सर्वांसमक्ष सन्मान्य आणि पुज्य वसुदेवाची क्षमा मागुन अका रण मांडलेले वैर मिटवुन टाक.अंधकाचे भाषण ऐकुन कंसाला भयंकर क्रोध आला पण मनावर संयम ठेवुन मानभावी पणे अक्रुराला म्हणाला,मल्लविद्येत कुशल राम-कृष्णाला,आपले प्रख्यात चाणुर व मुष्टीक मल्लांबरोबर स्पर्धेसाठी त्यांना घेऊन ये.आतुन धुसमसत असले ला पण वरपांगी शांतता दाखवणार्‍या कंसाने सभा बरखास्त करुन निघुन गेला.

कंस आपल्या महालातील मंचकावर अस्वस्थपणे विचार करुं लागला,नारदाची भविष्यवाणी खरी तर ठरणार नाही ना? नाही… नाही… तो दुष्ट कृष्ण इथे येण्यापुर्वीच त्याला वृंदावनात ठार मारण्यासाठी आपला भाऊ केशीला आज्ञा केली.आज्ञेप्रमाणे एका भयंकर घोड्यावर बसुन केशी निघाला.नेहमी प्रमाणे प्रातःकालीच बलराम कृष्ण गोपां सह गाई चारण्यास वनांंत निघाले होते. श्रीकृष्ण दिसल्याबरोबर केशीने त्याच्यावर चालुन आला तरी निर्भयपणे कृष्ण स्थीर उभा होता.त्या भयंकर घोड्याने कृष्णाला चावा घेण्यासाठी तोंड उघडले असतां,कृष्णाने आपले वज्रासारखे मजबुत मनगट थेट त्याच्या तोंडात घालुन त्याचे दात उचकटुन काढले.क्रोधीत घोड्याने पुढच्या टांचा कृष्णाच्या छातीवर मारण्यासाठी उचल ल्या बरोबर,त्याच्या टापा पकडुन उलथुन टाकल्याबरोबर पाठीवरचा स्वार व घोडा दोघेही गतप्राण झालेत.

क्रमशः
संकलन – मिनाक्षी देशमुख.

!!! श्रीकृष्ण !!! भाग -१२.

मल्लयुध्द स्पर्धेसाठी मथुरेत यमुना तीरी विस्तिर्ण मोकळ्या मैदानात मध्य भागी मल्लवीरांना आपले कौशल्य दाखवण्यासाठी मोठा हौदा बांधला. त्याच्या भोवती उंच बिनसंधीचे खांब उभारुन प्रचंड प्रेक्षगार हजारो लोक बसतील असे तयार केले.एका उंच वेदी वर रत्नजडीत सुवर्ण सिंहासन व त्याच्या दोन्ही बाजुस सरदारांना बसण्यासाठी मंच तयार केले.तसेच इतर श्रेणीच्या व दर्जाच्या माणसांसाठी पण बसण्याची व्यवस्था केली.अंतःपुरातील राजस्रीया व सरदार स्रीयांसाठी पडदपोशीची जागा करविली. ही सर्व सुंदर रचना पाहुन केशी वधाने संतप्त कंस खुश झाला.खाण्या पिण्याची, व प्रसंग पडल्यास औषधीची पण व्यवस्था करविली.उदईक बारा वाजतांसाठी शहरांतील प्रतिष्ठीत लोकांना निमंत्रित केले.

ही सर्व तयारी झाल्यावर त्याने अक्रुराला वृंदावनला जाऊन बलराम कृष्णाला आणण्याची आज्ञा केली.त्याला पाठवल्यावर कंस थोडा स्वस्थचित्त जरी झाला तरी आंतुन तो धसकला होताच. नारदाची वाणी असत्य होणार नाही.मग आपण आपल्या मृत्युला आमंत्रण तर दिले नाही ना? यातुन मार्ग काढण्यासाठी गुप्तपणे चाणूर व मुष्टकाला बोलावुन बलराम कृष्णला कमी लेखुं नका.जीवा पाड प्रयत्न करुन शत्रुचे निर्दालन करा. त्यांनी कंसाला अश्वास्त करुन निघुन गेले तरी सुध्दा तो निश्चिंत झाला नाही.कष्णा चा आतांपर्यतचा पराक्रम पाहतां या दोन मल्लांनाही जिंकेल,मग काय करावे? उद्या अक्रुर निघणार! सुचले.. तेवढ्या मध्य रात्री त्याने दुताला पाठवुन महा बलाढ्य व मस्तवाल कुवल्यापीठ नांवा च्या हत्तीच्या माहुताला बोलावले.तो आल्यावर माहुताला म्हणाला,मंडपाच्या प्रवेशद्वाराजवळ भरपुर सोमरस पाजले ला कुवल्ल्यापीड अश्या तर्‍हेने उभा करा की,जणुं त्याच्या स्वागतासाठी उभा आहे.

आणि कृष्ण दरवाज्याजवळ आला की, बेफाम हत्तीने त्याला चिरडुन टाकावे. महाराज! आपण निश्चिंत असावे.आज्ञे प्रमाणे होईल, असे म्हणुन माहुत निघुन गेला आणि कंस कांहीसा स्वस्थ होऊन निद्राधिन झाला.

माहुताच्या आश्वासनाने कंस थोडा स्वस्थ झोपला, त्याचवेळी सर्वमान्य वयो वृध्द अंधकाच्या घरी कंसाच्या जुलमाने त्रस्त झालेले सर्व यादव,वृष्णी,भोज इत्यादी क्षत्रिय मध्यरात्री जमुन कंसाच्या निर्दलनासाठी विचारविनिमय करुं लागले. कंसाने निष्कारण वसुदेवाची केलेली निंदा व निरपराध बलराम कृष्णा ला ठार मारण्याचा त्याचा बेत म्हणजे जुलुमाचा कळसच झाला.श्रीकृष्णाला वाचवुन कंसाचा काटा काढण्यासाठी अक्रुराला आपल्याकडे वळविण्यासाठी त्याला आताच गाठावे लागेल.अक्रुर आल्यावर प्रथम त्याच्याकडुन वचन घेऊन कंसाचा बेत कृष्णाच्या कानी घालण्यास सांगुन कंसाचा कायमचा बंदोबस्त केल्यास कोणीही हरकत घेणार नाही असे सुचवण्यास सांगीतले.या कामगिरीच्या बदल्यात आहुकाची कन्या सुगात्री देण्याचे आश्वासन दिले.

खरें तर अक्रुराचा कल आधी पासुनच श्रीकृष्णाकडे होता.पण कंसाच्या दहशतीमुळे त्याला शक्य नव्हते.पण आता मोठ्या आनंदात रथ घेऊन संध्याकाळच्यावेळी वृंदावनास नंद वाड्यात पोहोचला.सौंदर्याचा पुतळा,दुर्ज नाचा कर्दनकाळ समोर दिसतांच त्याच्या दर्शनाने अक्रुर सद्गदीत झाला.हाच..हाच! तो दुष्ट संहारक!अक्रुरचे ह्रदय भक्तीभावा ने दाटुन आले.तेवढ्यात श्रीकृष्णाची नजर पडल्याबरोबर त्याला कडकडुन मिठी मारली.मथुरेहुन रथ घेऊन अक्रुर कशासाठी आला हे जाणण्यासाठी गोप जमा झाले.अक्रुराने सांगीतले की,कंस राजाने धनुर्यज्ञाचे व कुस्त्याचे आमंत्रण देण्यासाठी मला पाठविले.कृष्णाला म्हणाला,तू वसुदेवपुत्र आहे हे कंसाला समजल्यापासुन तो वसुदेवाला त्रास देत आहे.कृष्णा! वसुदेव-देवकी तुझ्या वाटे कडे डोळे लावुन बसले आहेत.गेली १६-१७ वर्षापासुन अपार दुःख यातना भोगत आहेत,आतां त्यांचे ऋण फेडण्या ची वेळ आली आहे. उद्या मथुरेला जाण्याची तयारी करण्यात रात्र संपली.

जेवणे झाल्यावर नंदाघरी अक्रुर, बलराम कृष्ण एकांतात रात्रभर खल करीत बसले होते.नंद आपल्या खोलीत बिछान्यावर बेचैनावस्थेत पहुडले होते. कृष्ण मथुरेला जाणार म्हणजेच तो कायमचा जाणार!कृष्ण आपला पुत्र नसुन वसुदेवाचा आठवा पुत्र व त्याच वेळी आपल्याला झालेली मुलगी घेऊन गेला ही हकिकत कळल्यावर त्याच्या वियोगाची वेळ इतक्या लवकर व अचानक येईल असे त्याला वाटले नव्हते. गेली १६-१७ वर्षे वसुदेव देवकीला पुत्र विरहाचे दुःख सहन करावे लागले,त्या मुळे आतां त्याला मथुरेला जाणे क्रम प्राप्तच आहे.आता वृंदावनाचा आनंद जाणार म्हणजे एकप्रकारे प्राणच जाणार यामुळेच नंद जास्त अस्वस्थ झाले.यशोदे च्या दुःखाला तर पारावारच राहिला नाही.

क्रमशः
संकलन – मिनाक्षी देशमुख.

!!! श्रीकृष्ण !!! भाग – १३.

मल्लयुध्द स्पर्धेसाठी मथुरेत यमुना तीरी विस्तिर्ण मोकळ्या मैदानात मध्य भागी मल्लवीरांना आपले कौशल्य दाखवण्यासाठी मोठा हौदा बांधला. त्याच्या भोवती उंच बिनसंधीचे खांब उभारुन प्रचंड प्रेक्षगार हजारो लोक बसतील असे तयार केले.एका उंच वेदी वर रत्नजडीत सुवर्ण सिंहासन व त्याच्या दोन्ही बाजुस सरदारांना बसण्यासाठी मंच तयार केले.तसेच इतर श्रेणीच्या व दर्जाच्या माणसांसाठी पण बसण्याची व्यवस्था केली.अंतःपुरातील राजस्रीया व सरदार स्रीयांसाठी पडदपोशीची जागा करविली. ही सर्व सुंदर रचना पाहुन केशी वधाने संतप्त कंस खुश झाला.खाण्या पिण्याची, व प्रसंग पडल्यास औषधीची पण व्यवस्था करविली.उदईक बारा वाजतांसाठी शहरांतील प्रतिष्ठीत लोकांना निमंत्रित केले.

ही सर्व तयारी झाल्यावर त्याने अक्रुराला वृंदावनला जाऊन बलराम कृष्णाला आणण्याची आज्ञा केली.त्याला पाठवल्यावर कंस थोडा स्वस्थचित्त जरी झाला तरी आंतुन तो धसकला होताच. नारदाची वाणी असत्य होणार नाही.मग आपण आपल्या मृत्युला आमंत्रण तर दिले नाही ना? यातुन मार्ग काढण्यासाठी गुप्तपणे चाणूर व मुष्टकाला बोलावुन बलराम कृष्णला कमी लेखुं नका.जीवा पाड प्रयत्न करुन शत्रुचे निर्दालन करा. त्यांनी कंसाला अश्वास्त करुन निघुन गेले तरी सुध्दा तो निश्चिंत झाला नाही.कष्णा चा आतांपर्यतचा पराक्रम पाहतां या दोन मल्लांनाही जिंकेल,मग काय करावे? उद्या अक्रुर निघणार! सुचले.. तेवढ्या मध्य रात्री त्याने दुताला पाठवुन महा बलाढ्य व मस्तवाल कुवल्यापीठ नांवा च्या हत्तीच्या माहुताला बोलावले.तो आल्यावर माहुताला म्हणाला,मंडपाच्या प्रवेशद्वाराजवळ भरपुर सोमरस पाजले ला कुवल्ल्यापीड अश्या तर्‍हेने उभा करा की,जणुं त्याच्या स्वागतासाठी उभा आहे.

आणि कृष्ण दरवाज्याजवळ आला की, बेफाम हत्तीने त्याला चिरडुन टाकावे. महाराज! आपण निश्चिंत असावे.आज्ञे प्रमाणे होईल, असे म्हणुन माहुत निघुन गेला आणि कंस कांहीसा स्वस्थ होऊन निद्राधिन झाला.

माहुताच्या आश्वासनाने कंस थोडा स्वस्थ झोपला, त्याचवेळी सर्वमान्य वयो वृध्द अंधकाच्या घरी कंसाच्या जुलमाने त्रस्त झालेले सर्व यादव,वृष्णी,भोज इत्यादी क्षत्रिय मध्यरात्री जमुन कंसाच्या निर्दलनासाठी विचारविनिमय करुं लागले. कंसाने निष्कारण वसुदेवाची केलेली निंदा व निरपराध बलराम कृष्णा ला ठार मारण्याचा त्याचा बेत म्हणजे जुलुमाचा कळसच झाला.श्रीकृष्णाला वाचवुन कंसाचा काटा काढण्यासाठी अक्रुराला आपल्याकडे वळविण्यासाठी त्याला आताच गाठावे लागेल.अक्रुर आल्यावर प्रथम त्याच्याकडुन वचन घेऊन कंसाचा बेत कृष्णाच्या कानी घालण्यास सांगुन कंसाचा कायमचा बंदोबस्त केल्यास कोणीही हरकत घेणार नाही असे सुचवण्यास सांगीतले.या कामगिरीच्या बदल्यात आहुकाची कन्या सुगात्री देण्याचे आश्वासन दिले.

खरें तर अक्रुराचा कल आधी पासुनच श्रीकृष्णाकडे होता.पण कंसाच्या दहशतीमुळे त्याला शक्य नव्हते.पण आता मोठ्या आनंदात रथ घेऊन संध्याकाळच्यावेळी वृंदावनास नंद वाड्यात पोहोचला.सौंदर्याचा पुतळा,दुर्ज नाचा कर्दनकाळ समोर दिसतांच त्याच्या दर्शनाने अक्रुर सद्गदीत झाला.हाच..हाच! तो दुष्ट संहारक!अक्रुरचे ह्रदय भक्तीभावा ने दाटुन आले.तेवढ्यात श्रीकृष्णाची नजर पडल्याबरोबर त्याला कडकडुन मिठी मारली.मथुरेहुन रथ घेऊन अक्रुर कशासाठी आला हे जाणण्यासाठी गोप जमा झाले.अक्रुराने सांगीतले की,कंस राजाने धनुर्यज्ञाचे व कुस्त्याचे आमंत्रण देण्यासाठी मला पाठविले.कृष्णाला म्हणाला,तू वसुदेवपुत्र आहे हे कंसाला समजल्यापासुन तो वसुदेवाला त्रास देत आहे.कृष्णा! वसुदेव-देवकी तुझ्या वाटे कडे डोळे लावुन बसले आहेत.गेली १६-१७ वर्षापासुन अपार दुःख यातना भोगत आहेत,आतां त्यांचे ऋण फेडण्या ची वेळ आली आहे. उद्या मथुरेला जाण्याची तयारी करण्यात रात्र संपली.

जेवणे झाल्यावर नंदाघरी अक्रुर, बलराम कृष्ण एकांतात रात्रभर खल करीत बसले होते.नंद आपल्या खोलीत बिछान्यावर बेचैनावस्थेत पहुडले होते. कृष्ण मथुरेला जाणार म्हणजेच तो कायमचा जाणार!कृष्ण आपला पुत्र नसुन वसुदेवाचा आठवा पुत्र व त्याच वेळी आपल्याला झालेली मुलगी घेऊन गेला ही हकिकत कळल्यावर त्याच्या वियोगाची वेळ इतक्या लवकर व अचानक येईल असे त्याला वाटले नव्हते. गेली १६-१७ वर्षे वसुदेव देवकीला पुत्र विरहाचे दुःख सहन करावे लागले,त्या मुळे आतां त्याला मथुरेला जाणे क्रम प्राप्तच आहे.आता वृंदावनाचा आनंद जाणार म्हणजे एकप्रकारे प्राणच जाणार यामुळेच नंद जास्त अस्वस्थ झाले.यशोदे च्या दुःखाला तर पारावारच राहिला नाही.

क्रमशः
संकलन – मिनाक्षी देशमुख.

!!! श्रीकृष्ण !!! भाग – १४.

या सर्वांमधे राधा मात्र कृष्णाला दिसत नव्हती,त्याची नजर भिरभिरत होती.आणि तो गतस्मृतीत लुप्त झाला. एके दिवशी मधुवनात त्याची प्रिय सखी राधाने सर्व सवंगड्यामधुन खेचतच बाजु ला एका वृक्षाखाली आणले.तीला कांही भेटवस्तु कृष्णाला द्यायची होती.तिने वस्राच्या ओच्यात लपवुन आणली होती. ती आज अगदीच वेगळी अपूर्व अपार तेजाने लखलखत होती,वेगळीच दिसत होती.कृष्णाने तिला कारण विचारल्यावर क्षणैक लाजली.मनमोहना !आज मी तुला अपूर्व भेट देणार आहे असे म्हणुन ओच्यात जपुन आणलेली भेट बाहेर काढुन त्याच्या समोर धरली.इवल्या इवल्या हिरव्याकंच पानांच्या रानवेलीचा एक मुकुट होता.त्यात खोचलेलं मोरपीस खुलून दिसत होते.तो मोरपीसधारी मुकुट डोळे विस्फारुन बघतच राहिला आणि हसुन तो मुकुट मस्तकी धारण केला.

कधी नव्हे तो तिचे डोळे पाणथरुन आले.भावमुग्धतेने तीनं त्याच्या पुष्ट, मजबुत खांद्यावर अलगद मान टेकवली. तिच्या मुग्ध अलौकिक रुपाकडे तो भान हरपुन एकटक बघतच राहिला.त्याला पहिली भेट आठवली. त्या सायंकाळी वनांतुन गोधन घेऊन घराकडे परतत असतांना मुरलीतुन निघत असलेल्या सूरात तन्मय,तल्लीन असतांना एक तरुण,सशक्त,गोरीपान,अरागस,त्याच्या पेक्षा वयाने मोठी,उंच रेखीव,अप्रतिम सुंदर,अंगभर ओढणीचा पदर घेतलेली एका गोप स्रीने धावत येऊन त्याचे हात गपकन धरले.त्याची मुरली एकदम थांबली.ती म्हणाली,किती सैरभैर करतोस रे ही मुरली वाजवुन कन्हैया!हातातील मुरली तशीच धरुन तो स्तब्ध झाला सवंगड्यात नसल्यासारखा!

तिच्या त्या पहिल्याच स्पर्शात काय नव्हते?त्याच्या दोन्ही आयांची माया,छोटी भगिनी एकानंगेची निरागसता,असे शब्दा त कधीच न सांगतां येणारे भाव होते. त्याला कळून चुकले की, ही या देहाचाच एक अवयव आहे.त्याची वासनारहित प्रिया,निरपेक्ष सखी म्हणुन आज त्याची गोपदीक्षा झाली होती.सर्व नात्यांपलिकड ची ‘स्री’ निसर्गसत्य आहे याची जाणीव झाली.घरी आल्यावर नेहमीच्या शिरस्त्या प्रमाणे दिवसभरात घडलेल्या घटना यशोदामातेला सांगतांना त्याने राधेचा पण उल्लेख केल्यावर यशोदा म्हणाली, अरे! ही रायाण गोपाची ज्याला अनय सुध्दा म्हणतात त्याची पत्नी राधा.ती अरिष्र्टग्रामातुन सासुरवाशीन म्हणुन गोकुळात आलेली आहे.पण जरा जपुन, तिचा पती रायाण फार तापट स्वभावाचा आहे हं!कधी कधी रायाण बेभान होऊन कृष्णाच्या कागाळ्या घेऊन नंदवाड्यात येऊन म्हणायचा, या तुमच्या कान्हाने माझी पत्नी राधाला फितवले,नादी लावले.मग त्याची समजुत काढली की, तो मग मुकाट चडफडत निघुन जाई.

तिच्या मुग्धपणे लाजण्याचे कारण त्याला कळले.ती आज पहिल्यांदाच ऋतु स्नान झाली होती.खर्‍याखुर्‍या ‘स्रीधर्मात’ गेली होती.आणि आजच तिने दिलेला मोरपीसधारी मुकुट स्विकारुन तिच्या साक्षीने पुर्ण विचारपुर्वक मस्तकी धारण केला होता.का? ते मोरपीस होतं एका निरामय शास्वताचं,समस्त स्रीत्वाच्या निर्माणशील अशा परम पवित्र मंगलतेचं नाजुक प्रतिक होते. त्याने पुर्ण विचारांती जाणीवपूर्वक जीवनारंभी स्वच्छपणे मस्तकी धारण केलं होतं.राधा त्याची पहिली स्री गुरु,स्रीत्वाच्या सर्व भावभाव नांची दीक्षा देणारी,तरीही अबोध,कधी खुप बोलुन,तर कधी मूक राहुन,कधी धावत्या स्पर्शानं,तर कधी भावउधळ्या कक्षातुन ही दीक्षा त्याला दिली.वासना रहित,भावभारित,अतुल प्रेमयोगाची, मधुरा भक्तीची त्याची प्रिय सखी, पहिली स्रीगुरु म्हणजेच राधा. राधा.. कृष्णाच्या जीवनातील केवळ अजोड जोड होती.

वृंदावनाचा निरोप म्हणजे राधा कृष्णाच्या प्रेमाची अतुलनीय विशुध्द भावप्रेमाचा निरोप होता.तो खेचल्या सारखा राधेसमोर उभा राहुन तिने भेट दिलेली छातीवरची वैजयंतीमाला दाखवुन म्हणाला,तू दिलेली ही तुझी भाव भेट सदैव माझ्या छातीशीच राहील.तिचा विसर कधीच पडणार नाही..कधीच नाही आणि कृष्णाने आपली अनमोल प्राण प्रिय बासरी भेट दिली आणि अक्रुराला रथ आणण्याचा इशारा केला.आणि अक्रुराने चालु केलेल्या रथात बलराम कृष्ण बसले.थांब अक्रुरा,..!जरा आम्हा ला कृष्णाचे मुख अवलोकन करु दे रे… त्याच्या पायावर मस्तक ठेवु देरे…त्याचे मधुर शब्द ऐकु दे रे…अक्रुरा अरे थांब रे.. अक्रुरा थांबव की रे रथ…गोपी दुःखार्त उद्गारत रथामागे धावु लागल्या.आमचा प्राण,आमचा कृष्ण या दुष्ट अक्रुराने हिरावुन घेतला.कित्येक गोपी मुर्च्छित झाल्या.जड अंतःकरणाने रथात बसलेला श्रीकृष्ण वेगाने पुढे पुढे जात दिसेनासा झाला.आणि अक्रुर? श्रीकृष्णावरचे अलोट प्रेम पाहुन भक्तीभावाने विभोर झाला.

क्रमशः
संकलन – मिनाक्षी देशमुख.

!!! श्रीकृष्ण !!! भाग – १५.

रथ वेगाने चालला होता.मागाहुन नंद व इतर गोपांच्या गाड्या येत होत्या. वृंदावन मागे पडले.मार्गाच्या बाजुने यमुना नदी संथपणे वाहत होती.मागच्या गाड्या येईपर्यंत या पवित्र नदीत हातपाय धुवुन थोडं पाणी प्राशन करण्यासाठी अक्रुराला रथ थांबवायला सांगीतला. सकाळी घाईत निघाल्यामुळे अक्रुराचे स्नानसंध्या राहिल्यामुळे स्नानसंध्या करण्याची इच्छा झाल्याने बलराम कृष्णा ला जपुन राहयला सांगुन त्याने नदीत बुडी मारल्याबरोबर त्याला पाण्यात बलराम कृष्ण दिसु लागले,काय चमत्कार वर येऊन पाहतो तर ते दोघेही रथात बस लेले,त्याने परत बुडी मारली तर ,पुन्हा ते दोघेही पाण्यात,वर येऊन पाहिले तर रथा त दोघेही गप्पात रंगलेले दिसले.हा काय चमत्कार?रथात बसलेल्याची खात्री करुन परत बुडी मारली तर यावेळी प्रत्यक्ष भगवान श्रीशेषशायी नारायण त्याच्यासमोर उभे दिसले.सिध्द,चारण, गंधर्व,असुर स्तुती करत आहेत.

प्रचंड शेष वेटोळे घालुन बसलेला,सहस्र,शिखराचा कैलास पर्वतासारखा पांढराशुभ्र दिसत होता.त्याच्या मध्यभागी शेषशायी भगवान पिवळे रेशमी वस्र परिधान केलेले,हातात शंख,चक्र,गदा,अंगावरील आभुषणे चकाकत होती.अशा भगवंताचे दर्शन होताच अक्रुराचे ह्रदय भक्तीरसाने उचंबळून सास्तिक भाव जागृत होऊन कंठ दाटुन आल्याने डोळे मिटुन तो नत मस्तक झाला.क्षणभराने डोळे उघडुन पाहतो तो काय? समोरचे दृष्य लुप्त झाले.वर आल्यावर श्रीकृष्णाची लीला समजुन म्हणाला, देवा! पृथ्वी,आकाश, जल सर्व ठीकाणी तुझेच वास्तव्य आहे.

एवढ्यात मागच्या गाड्या आल्यात. अक्रुराचा रथ चालु लागला.रथ मथुरेत पोहचल्यावर अक्रुराने त्यांना आपल्या घरी उतरण्याची विनंती केल्यावर श्रीकृष्ण म्हणाला,पुढे नक्की येऊ!सध्या या सगळ्या गोपांसह गावाबाहेरच्या उद्यानात उतरतो,तूं कंसाला आम्ही आल्याची वर्दी दे.सर्व गोपांबरोबर नंद, कृष्ण बलरामाने बगीच्यात सोबत आणलेली न्याहारी करुन निवडक गोप मल्लासह राम-कृष्ण मथुरा नगरीचा फेर फटका मारायला निघाले.मथुरेचे सौंदर्य पाहत,कृष्णाच्या मनात विचार आले याच मथुरेत माझा जन्म झाला,माझे मातापिता इथेच बंदीवासात व आतां अज्ञातवासात आहेत.कंसाच्या जुलमामुळे अनेक क्षत्रिय त्रस्त झाले,तर कित्येक नगर सोडुन देशोधडीला लागले.ही सर्व माहिती अक्रुराकडुन त्याला कळली होती,त्यामुळे त्याचे मन दुःखी व संतप्त झाले.

आतां या सर्वांची कंसाच्या जाचातुन लवकरच सुटका करण्याचा मनोमन निश्चय केला. नंतर ते सर्वजण धनुर्मखासाठी उभारले ल्या प्रेक्षागार व राजवाड्याकडे निघाले. बाजारपेठेत खास राजासाठी रंगवलेली बहुमोल रेशमी वस्र पाहुन बलराम कृष्णा ने दुकानदारास ती सुंदर वस्रे मागीतल्या वर दुकानदाराने त्यांची निर्भत्सना करुन वस्र देण्याचे नाकारल्यावर,संतापलेल्या श्रीकृष्णाने आपल्या वज्रासारख्या हाता च्या एका तडाख्यातच तो गतप्राण झाला मग तिथली निवडक वस्रे परिधान करुन मदमस्त हत्तीसारखे डुलत डुलत दोघेही फुलांच्या दुकानांत गेल्यावर,माळ्याने या दोन सुंदर कुमारांना पाहुन आनंदाने व आदराने सुंदर फुलांचा भरगच्च हार दिले. त्याला आशिर्वाद देऊन ते पुढे निघाले.

तेवढ्यात राजा कंसाची आवडती दासी कुब्जा अनुलेपन पात्र घेऊन जातां ना दिसल्यावर कुठे जातेस म्हणुन कृष्णा ने विचारल्यावर,कंसाकडे अनुलेपन घेऊन जात होती,पण आतां तुच घे!तुझ्या सौंदर्याला व देहाला शोभुन दिसेल. कुब्जेच्या हातची उटी घेतली व आपल्या बोटाचा स्पर्श तिच्या पोक आलेल्या पाठी ला हलकेच स्पर्श केल्या बरोबर,काय आश्चर्य? तिचे कुबड नाहीसे होऊन तिचा देह अत्यंत कमनिय दिसु लागला. तिला आशिर्वाद देऊन उद्या होऊ घातले ल्या धनुष्ययज्ञाची जागा,जिथे जगविख्या त धनुष्य ठेवले होते ते पहायला गेले.

इंद्रा दीधेवांची देखील तो प्रचंड स्तंभासारखा अवजड धनुष्य सज्ज करण्याची प्राज्ञा नव्हती.ते अवजड धनुष्य श्रीकृष्णाने सहजलिलेने वर उचलुन वाटेल तसे फिरवुन जोराने वाकवल्या बरोबर ते जग विख्यात धनुष्य मधोमध मोडुन त्याचे दोन तुकडे झाले.हा अद्भुत प्रकार पाहुन तिथे जमलेले लोक आश्चर्यचकित झाले. श्रीकृष्णाची दीव्य मूर्ती लोकांच्या डोळ्या चे पारण फिटले.गर्दीतुन वाट काढत श्रीकृष्ण बलराम आपल्या गोपसख्यांसह प्रेक्षागाराकडे निघाले.इकडे प्रमुख शस्ररक्षक ते अवजड धनुष्य मोडल्याची खबर देण्यासाठी धावत कंसाकडे गेला.

क्रमशः संकलन – मिनाक्षी देशमुख

                         

भगवान श्रीकृष्ण चरित्र संपूर्ण भाग

सर्व पौराणिक चरित्रे

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading