
एखादे ऐतिहासिक व्यक्तीरेखा रेखाटणे म्हणजे कठीण असे शिवधनुष्य पेलण्यासारखे आहे.सर्वांगीन विचार, त्या वेळच्या रुढीपरंपरा,रितीरिवाजांचा अभ्यास करुन,त्याकाळात आपले लिखान चपलखपणे बसवावे लागते. थोडाही कमकुवतपणा आला तर,त्या कलाकृतित कृत्रीमता भासू लागते. महाराणा प्रतापसिंहांच्या व्रतस्थ जीवनाविषयी आणि असिम त्यागा विषयी बरेच ऐकले होते.मराठीत त्यांचे वर जास्त लिखान आढळले नाही.हिंदी भाषेत मात्र भरपूर साहित्य आढळले.या बरोबरच कांही ऐतिहासीक दाखले,या सर्वांचं संकलन एकत्रीत करुन,इतिहासा शी प्रामाणिक राहून महाराणा प्रताप सिंहांचे चरित्र साकारण्याचा प्रयत्न केला आहे.कांही चुकले असल्यास मोठ् मनाने क्षमा करावी.
हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.
This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.
महाराणा प्रताप
!!! महाराणा प्रताप !!!
भाग – ५१.
ठरल्याप्रमाणे सर्वजण आपापल्या जागेवर लपले.मोगलांच्या तुकड्या मागुन तुकड्या येऊ लागल्या.आणि तिक्ष्ण बाणांच्या वर्षावाने प्रेतांचा खच पडूं लागला.लपलेले सर्व भिल्ल सैनिक पुढे येऊन मोगलांची शस्रे गोळा करुन ‘माचीन’ गुहेकडे निघून गेले.
कुॅंवर शक्तिसिंह,कुॅंवर अमरसिंह व मंत्रीपरिषदेचे सदस्य विविध भागात फिरुन गुप्त रितीने सैन्य गोळा करीत होते.एकदा तर कुॅंवर शक्तिसिंहने रात्रीच्या वेळी कडव्या सैन्याची तुकडी घेऊन मोगलाच्या ठाण्यावर चालुन झोपेतच सैनिक व ठाणेदारास ठार करुन ठाणे लुटुन शस्रे गोळा करुन मुक्कामी आला.शक्तिसिंहाचा पराक्रम पाहून, महाराणांनी त्याचे कौतुक केले.शक्तिची साथ मिळाल्यामुळे महाराणांच्या ध्येयपंखात बळ भरल्या गेले.
अजमेरचा सुभेदार रुस्तमखाॅं निधन पावल्यामुळे त्या जागेवर विचार पूर्वक बैरामखानचा पुत्र अब्दुर्ररहिम उर्फ खानखानाची नियुक्ती झाली.शहाबाज आधी मोहिमेवर गेलेला असल्यामुळे त्याला पहाडी भागाची बरीच माहिती झालेली होती.खानखाना मुसलमान सरदार कवी मनाचा होता.रणांगणांवर जशी त्याची तलवार चाले तशीच लेखणी ही चालत असे.शहाबाजपेक्षा आपल्या वर अकबरने जास्त विश्वास टाकून जबाबदारी सोपवल्यामुळे तो स्वतःला पराक्रमी व थोर समजुं लागला.
सुभेदार खानखाना परिवारासहित
अजमेरहून बेसेरपूरला येऊन तिथे आपली छावणी टाकली.ही खबर कुॅंवर अमरसिंहाला लागल्याबरोबर त्याने आपल्या सैन्याना सावध राहण्याच्या सूचना दिल्या. खानखानाने आपला परिवार बेसेपूरला ठेवून कांही सैन्यासह महाराणांच्या शोधार्थ निघालेला कळतांच महाराणा ढोलनकडे निघून गेले.पिताजीं च्या शोधार्थ खानखाना निघाल्याचे कळतांच त्याचे लक्ष दुसरीकडे वळविण्या च्या दृष्टीने अमरसिंहने त्याच्या छावणीवर अचानक हल्ला केला.प्रत्यक्ष सुभेदराच्या छावणी वरच हल्ला होईल याची कुणालाच कल्पना नसल्यामुळे सारे मोगल सैनिक बेसावध होते.मोगल सैन्य सावध होईस्तो छावणीची लुटमार करुन त्यात चांगल्या मौल्यवान वस्तू प्राप्त झाल्यात.अचानक झालेल्या हल्ल्यामुळे खानखानाच्या परिवारातील बेगम,पुत्र,भगिन्या भयभीत होऊन मदतीसाठी मोठमोठ्याने ओरडू लागल्या.अमरसिंहने त्यांना कैद केले. त्यांना लुटलेला माल,शस्रास्रे घेऊन मुक्कामाच्या ठीकाणी आला.
कुॅंवर अमरसिंह व चंदावत रावत कृष्णसिंह लुटीचा माल व खानखानाचा परिवार घेऊन महाराणासमोर आले.लुट बघून तर त्यांना आनंद झाला,पण स्रीया मुलं बघून त्यांना भयंकर संतापून म्हणाले कुॅंवर तुम्ही फार छान काम केले.उद्या राजस्थानच्या इतिहासात नोंद होईल की,
महाराणा प्रतापसिंह शत्रूच्या बायका मुलांना लुटुन त्यांना त्रास देत होते.त्यांच्या इज्जतीशी खेळत होते. चंदावत रावतकडे बघत म्हणाले,अमर तर अननुभवी आहे पण आपण तर अनुभवी असून आमचा स्वभावही जाणता!हा अक्षम्य अपराध आहे. महाभारतातील द्रौपदीच्या पदराला हात घालणार्या दुर्योधन,दुःशासनाच्या पंगती त तुम्ही दोघांनी आम्हाला बसवले.
अमरसिंह कां असे केलेस?ओलीस म्हणून आणले होते.ओलीस आणि स्रीया
आपल्या राजपुतांच्या धर्मात स्रीयांना देवतेसमान मानत असून नेहमी त्यांचा आदर करतो.मग स्री ही कोणत्याही जाती धर्माची असली तरी ती स्री असते. ह्या सार्या स्रीयांना तुमच्या माताजीकडे घेऊन जा व त्यांची खणा नारळाने ओटी भरुन,चांगल्या विश्वासू सैनिकाच्या संरक्षणात सुभेदार खानखानाच्या छावणीवर सुरक्षित पोहोचवुन द्या.
सुभेदार खानखानाला आपल्या स्रीयांना कैद करुन राजपुतांनी नेल्याचे कळतांच तो अत्यंत क्रोधित झाला,पण त्यांना सुरक्षित पोहोचवल्याचे व बेगमने घडलेली हकिकत सांगीतल्यावर, महाराणा प्रतापसिंह किती उच्च कोटीचा महापुरुष आहे,त्याचा संताप ओसरुन त्यांच्याविषयी आदर निर्माण झाला.हीच घटना मोगलांच्या बाबतीत घडली असती तर,राजपुत स्रीयांना आपल्या भोगदासी बनवून भ्रष्ट केल्या असत्या.हाच फरक आहे,संस्कृती,संस्काराचा!स्री दाक्षिण्य हा भारतीय हिंदु संस्कृतीचा उत्तम सर्वांगसुंदर असा नमुना होता.तो अजमेर व अकबरचा सुभेदार असल्या मुळे अकबरचा आदेश टाळूं शकत नव्हता.महाराणांचा शोध घेण्यासाठी तो पहाडात गेला.पण शत्रुत्वाचे भाव नव्हते. ही घटना घडण्याआधी त्याने भामाशाह ला भरपूर द्रव्याचे आमिष दाखवुन फितवण्याचा खुप प्रयत्न केला पण महाराणांच्या आदर्शाचा समर्थक भामाशाहाने स्पष्ट नकार दिला होता.
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
!!! महाराणा प्रताप !!!
भाग – ५२.
अकबरला ही बातमी कळल्या वर तो ही स्तंभित झाला.त्याला कळून चुकले,खानखाना पूर्वीसारखा महाराणां च्या शोधास रस घेणार नाही.१५८१ मधे त्याला परत बोलावुन,त्याची अजमेरची सुभेदारी काढून,शहजादा सलीमची सल्लागार म्हणून नेमणूक केली.अकबर ची स्थिती अतिशय केविलवाणी झाली. बंगाल-बिहारच्या बंडाळीने गंभीर स्वरुप घेतल्यामुळे बहुतेक सैन्य बंगालकडे पाठवावे लागले.याचवेळी त्याचा धाकटा भाऊ मुहम्मद हकीम मिर्झा,काबुलचा सुभेदार, त्यानेही बादशहा विरुध्द बंड पुकारले.त्याच्या जवळ पुरेसे सैन्य, नसल्यामुळे त्याला स्वतःला काबुलकडे जावे लागले.अकबरची सर्व बाजूंनी कोंडी झालेली पाहून महाराणांनी एकदम गरुड भरारी घेतली.
कुंभळगड,गोगुंडा,उदयपूर ही मोगल ठाणी ताब्यात घेतली.पहाडी प्रदेशात असलेले मोगल सैनिक पिटाळून लावले.शासकिय व्यवस्था उत्तम केली. पुरेसे सैनिक बळ नसतांनाही महाराणांनी आपला अंमल बसवला. १५८१ ते १५८४ पर्यंतचा चार वर्षाचा काळ शांततेत व सुब्बतेत गेला.सर्वदूरवर शेतीचे उत्पन्न होऊ लागले.गोडवाड,सिरोही,माळवा, अबू,गुजराथ कडील सर्व मार्ग व्यापारा साठी खुले झाले.राजकियदृष्ट्या चावंड ला अतिशय महत्व प्राप्त झाले.मधल्या काळात महाराणांंनी अतिशय हालअपेष्टा सहन केल्या होत्या.कधी उपाशी,तर कधी कंदमुळे,जंगलातील बियांच्या भाकरी,उंबराची फळे यावर गुजरान केली होती.कोणी आणून दिलेली चटणी भाकर खाल्ली.जमीनीची शय्या,धोंड्या ची उशी व आकाशाचे पांघरुण केले होते त्यामानाने सध्याचा काळ त्यांना सुब्बते चा वाटत होता.तरीसुध्दा प्रतिज्ञेनुसार ते शेवटपर्यंत झोपडीतच राहिले.
ह्या शांतीपर्वात महाराणांनी मेवाड चा सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने चित्र कला,साहित्यात भरपूर प्रगती केली. किल्ल्याची डागडुजी केली.अकबर नसल्याच्या संधीचे त्यांनी सोने केले. त्यांनी जवळजवळ संपूर्ण मेवाड अधिप त्याखाली
आणले होता.ह्या सर्व बातम्या काबुलमधे असलेल्या अकबरला कळवल्या जात होत्या.मेवाडची व महाराणांची होत असलेली प्रगती त्याच्या डोळ्यात सलत होती.चार वर्षानंतर पुन्हा मेवाडवर स्वारी करण्यासाठी भगवानदासचा धाकटा भाऊ,जगन्नाथ कछवाहने हळदीघाटाच्या युध्दात चांगला पराक्रम गाजवला होता.५ डिसेंबर १५८४ ला जगन्नाथ कछवाहसह बक्षी जाफरबेग आणि सय्यद राजु या दोन मोगल सरदारांना मुद्दाम देऊन मेवाड मोहिमेवर रवाना केले.
त्यावेळी महाराणा मांडलगडच्या आसपास असतांना ते मंत्र्यांसोबत विचार विनिमय करीत होते.त्याचवेळी गुप्तहेराने जगन्नाथ कछवाह मेवाडवर चालून येत असल्याची वार्ता दिल्यावर ते आपल्या सैन्यासह चितोडगडच्या पहाडी मुलखात निघून गेले.जगन्नाथने सय्यद राजुला मांडलगडला रक्षणार्थ ठेवून स्वतः चावंडला निघाला.त्याला अडवण्यासाठी त्या परिसरांत लपलेल्या महाराणांच्या तुकड्यांनी गनिमी काव्याने मोगलांवर हल्ला करण्यास सुरुवात केली.मांडलगड वर ठेवलेल्या सैन्यावर हल्ले होत असल्याचे कळल्यावर तो माघारी मांडल गडकडे वळला.
महाराणांनी आपली राजधानी परिवारासह खाली केली व सैन्य पहाडात विखरुन दिले.जगन्नाथसिंहने रणनीती वापरुन,जास्तीत जास्त राजपूतांना महाराणांपासून तोडून त्यांना एकटे पाडून कोंडी करण्याचा उद्देश होता,तर शहबाज खानचा उद्देश प्रदेश काबिज करण्यावर होता.अकबरचे नेमके मर्म ओळखून महाराणांना,नाही तर निदान अमरसिंहा ला तरी दरबारात हजर करुन शरणागती पत्करुन अकबरचे सार्वभौमत्व स्विकारायला लावायचेच या हेतूने जगन्नाथ कछवाह छावणी एका ठीकाणी न ठेवतां सगळी फौज तुकड्या तुकड्यां नी फिरती ठेवण्याची आखणी करुन महाराणांना निवांतपणे कुठेही राहता येऊ नये,सतत पाठलागावर राहिले तर कुठे तरी सांपडतील अशी आशा त्याला वाटत होती.
दोन अडीच वर्षे महाराणा नुसते पळत होते.सोबत जास्त सैन्यही ठेवता येत नव्हते,कारण जास्त सैन्याची बातमी त्याला लगेच कळली असती.त्यामुळे राजपरिवार आणि १०-२० विश्वासू लोक ते ही पांगलेले असायचे.महाराणा पळत होते.जगन्नाथ कछवाह पाठलाग करीत होता.हा पळापळीचा प्रकार २-२॥ वर्षे चालू होता.आक्टोबर १५८५ मधे एके ठीकाणी महाराणा जवळ जवळ सांपडले च असते,पण गुप्तहेराने वेळेवर बातमी दिल्यामुळे ते थोडक्यात बचावले.एकदा एका गावात कुॅंवर अमरसिंह,त्याची पत्नी व महाराणांनी एका जुन्या घरांत आश्रय घेतला होता.मुसळधार पाऊस सुरु असल्यामुळे घर गळत होते.संपूर्ण रात्र उभ्यानेच काढावी लागली.अमरसिंहची पत्नी प्यारकंवर वैतागुन म्हणाली,तुम्ही राजपुत्र असून हाल सोसावे लागतात.
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
!!! महाराणा प्रताप !!!
भाग – ५३.
बाजुला उभे असलेले प्रतापसिंह शांतपणे म्हणाले,कुॅंवर अमरसिंह!तू प्यारकॅंवरसहित अकबर बादशहाला शरण जा.प्यारकॅंवरचे जीवन सुखमय होईल. कष्ट भोगावे नाही लागणार!पिताश्रीsss अमरसिंह व्यथीत स्वरात म्हणाला, आपल्या आदर्श तत्वांना पायदळी तुडवून तिलांजली देणे मला तरी शक्य नाही.पश्चातापदग्ध प्यारकॅंवर म्हणाली, महाराजसाहेब!या बेटीला एकवेळ माफ करावे,नकळत रात्रभर झालेल्या त्रासाने अभावितपणे बोलल्या गेले.सिसोदिया राजवंशाची मान खाली जाईल असे वर्तन कधीच माझेकडून घडणार नाही.माफ करा… माफ करा…शाब्बास आतां आमची राजसून शोभतेस !
जगन्नाथसिंह कछवाह महाराणांना पकडण्याची पराकाष्ठा करीत होता.१८ सप्टेबर १५८५ ला त्याने चावंडला घेराव करुन मजबूत वेढा दिला.राजमहालावर हल्ला केला,पण प्रतिहल्ला न झाल्यामुळे राजमहालात शिरला.रिकामा राजमहाल बघून संताप झाल्याने सर्व सामानाची लुटालुट,मोडतोड करुन चांगलीच नास धुस केली.शोध घेण्याचा आटोकाट प्रयत्न करुनही महाराणा सांपडत नाही, रिकाम्या हाताने परत गेल्यावर अकबर नुसता थयथयाट करेल,पण गत्यंतरही नव्हते.हताश होऊन फौजेसह तो चावंड वरुन निघाला,जातांना सारा पहाडी इलाका पिंजत शोध घेतच होता.पण अपयशच पदरी पडले.रिकाम्या हाताने परत आलेल्या जगन्नाथसिंहाला पाहून अकबर अतिशय संतापला.या मोहिमेत त्याचे फार मोठे नुकसान झाले होते. असंख्य सैनिक ठार तर झालेच,पण त्यांची सारी शस्रेही लुटल्या गेलीत.सम्राट अकबरने महाराणांसमोर हात टेकले. व हार मान्य केली.जवळ जवळ शरणागती पत्करली.
अफगाणांचा कायमचा बिमोड करण्यासाठी अकबरने आपली राजधानी लाहोरला नेली.पराभव पत्करुन तो लाहोरला गेल्याचे ऐकून प्रतापसिंहांना अतिशय आनंद झाला.त्यांचेवरचे दडपण एकदम कमी झाले.त्यांनी सर्व मंत्री, सामंत,सरदार यांना मसलतीसाठी बोलावून सर्वानुमते योजना तयार केली. अकबरच्या सततच्या आक्रमणात दहा वर्षाचा काळ धावपळीतच गेला,त्यामुळे घडी नीट बसवता आलीच नाही.अकबर ने मेवाडमधील बहुतेक सैन्य काढून उत्तर सीमेवर नेले तरी कांही ठाणी त्याच्या ताब्यात होतीच.अकबर तेरा वर्षे लाहोर मधे ठाण मांडून बसल्यामुळे १५८६ पासून हल्ले बंद झाल्यामुळे,प्रजेच्या कल्याणाच्या दृष्टीने महाराणांनी खालील प्रमाणे योजना आखली.१. मोगलांच्या कोणत्याही प्रदेशावर हल्ले,दंड वसूल करायचा नाही.
२. मेवाडमधून उत्तरेकडील माळवा व गुजराथकडे जाणारा मार्ग मोकळा ठेवणे. तसेच तिथून जाणार्या मुसलमानांना त्रास न देणे.
३. मोगलांच्या ताब्यात असलेला मेवाड प्रदेश स्वतंत्र करणे.
४. संपूर्ण मेवाडमधे कृषी,व्यापार,उद्योग धंदे,व्यवसाय नव्याने सुरु करुन,राज्याचा जास्तीत जास्त विकास करणे.
५. सैन्याचे पुर्नगठण करुन सैन्यव्यवस्था नीट ठेवणे.
दोन वर्षात महाराणांनी मेवाडचा सर्व पश्चिम भाग,चित्तौडगड व मांडलगड ताब्यात घेतला.पहाडी प्रदेशातील मोगलां च्या ताब्यातील भाग जिंकून,त्याठीकाणी हुद्देदार नेमून व्यवस्थित राज्यकारभार सुरु केला.१५८७ आक्टोबर मधे अमरसिंहाला भरपूर सैन्य देऊन मोहिमे वर रवाना केले.या मोहिमेत अमरसिंहने पराक्रमाची शर्थ करुन उदयपूर,देवरी, मोही,मदारिया,दिवेर,मंडळ,जहाणपूर,इ. ठीकाणी असलेली मोगलांची ठाणी उठवून,त्याठीकाणी आपली ठाणी वसवून मोगल सैनिकांना हाकलून लावले अमरसिंहाचा अतूल पराक्रम बघून तो उत्तम प्रकार मेवाडचे संरक्षण करेल ही महाराणांची खात्री झाली.महाराणांनी ३६ मोगल ठाणी ताब्यात घेऊन इतरही प्रदेश स्वतंत्र करुन तिथली व्यवस्था पुन्हा नीट बसवली.कुंंभळगड ते सराडा,छप्पनचा प्रदेश तसेच देसूरी ते मैंसरोड पर्यंतचा सर्व प्रदेशावर सत्ता व शांतता प्रस्थापित
केली.लोक निर्भयपणे उद्योगधंदे,सुपिक आणि मैदानी भागात नव्याने उजाड झालेली शेती सुरु केली.जे लोक पहाडा त पळून गेले होते ते परत येऊन गांवे वसवली.ग्राम पंचायतीची,न्याय निवाडीचीही कामे व्यवस्थित होऊ लागली.
सर्व जनता महाराणांची स्तुतीस्तोत्र गाऊं लागली.उत्तम प्रकाशक व सैनिक व्यवस्थेमुळे मेवाडचे रुपच बदलून गेले. फक्त खंत एकच होती…अजुनही मांडल गड व चित्तोडगड अकबरच्या ताब्यात होता.संघर्ष नको म्हणून गप्प बसले होते. हे दोन गड सोडले तर,त्यांनी त्यांनी बाकी चा मेवाड स्वतंत्र केला होता.पण अंगीकारलेले व्रत मात्र कायम होते. झोपडीत जमीनीवर निजणे,साधा आहार घेणे.निश्चितच ते एक योगी पुरुष होते.
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
!!! महाराणा प्रताप !!!
भाग – ५४.
आजपर्यंत महाराणांचे सारे जीवन संघर्षमय,धावपळीत गेल्यामुळे,सध्याचे जीवन त्यांना मिळमिळीत,साचलेल्या डबक्यासारखे वाटत होते.दुपारची वेळ होती.महाराणा आपल्या झोपडीत निवांत पहुडले असतां कुॅंवर अमरसिंह आणि तेजसिंह राठोडने झोपडीत प्रवेश करुन प्रणिपात करुन त्यांच्या इशार्यानुसार दोघेही समोर बसले.मागच्या संघर्षाच्या, धावपळीच्या गप्पा गोष्टी सुरु असतांनाच महाराणांनी शिकारीची इच्छा व्यक्त केली १-२ दिवसांत व्यवस्था करतो म्हणून दोघे निघून गेले.तीन चार दिवसांनी महाराणा, कुॅंवर अमरसिंह,शक्तिसिंह,तेजसिंह राठोड,आणखी ८-१० सरदार, काटेरी वेलींनी गुंफलेले,गगनचुंबी झाडे,डोंगराचे उंच निमुळते सुळके व भरपूर वाघ असलेल्या कोमलगिरीच्या अरण्यांत असलेल्या सरोवरा पासुन कांही अंतरावर झाडीत दबा धरुन लपुन बसले.
दुपारी वनराज तहान भागवायला सरोवरावर येतील अशी अटकळ होती.
तेजसिंह आणि शक्तिसिंह भूत काळातील आठवणीत गुंग असतांनाच झाडाच्या बुंध्दाला बांधलेला घोडा खिंकाळला.वाघ येत असल्याची ती सूचना होती.महाराणांनी आपले शस्र सज्ज केले.एक धिप्पाड वाघ दमदार पावले टाकीत महाराणा ज्या झाडीत दबा धरुन बसले होते त्याच्या अगदी समोर असलेल्या सरोवराकाठी सावधपणे येऊन उभा राहिला.महाराणांचा बाण सुटल्याशिवाय कोणीही बाण सोडू नये हा अलिखित नियम होता.
महाराणांनी अचुक शरसंधान साधून सोडलेला बाणाने वाघाच्या मर्म भेद होऊन घाव घातला.एकदोन आचके देऊन त्याने प्राण सोडला.वाघाची शिकार झाली.एक सळसळणारे चैतन्य कायमचे शांत झाले.पण महाराणांची अवस्था मात्र विपरित झाली.चेहरा पांढरा फटक पडला.वाघाची शिकार झाल्याचा आनंद नव्हता तर वेदनेने त्यांचे मुख मुलुल झाले महाराणांची अवस्था बघून कुॅंवर अमर सिंह धावत त्याचेजवळ येऊन काय झाले म्हणून विचारल्यावर,ते म्हणाले,प्रत्यंचा खेचतेवेळी पोटात खुप जोराची कळ निघाली होती.आतां सहन करण्यापलि कडे असह्य वेदना होत आहेत.
शिकारीला आलेले सारे त्यांच्या भोवती जमा झाले.अचानक उद्भवलेल्या प्रकाराने सारेच हवालदिल,भयभीत झाले.त्यांना घोड्यावर बसवून हळूहळू चावडला आणले.राजवैद्याच्या उपचाराने थोडा फरक पडला.शिकारीच्यावेळी धनुष्याची प्रत्यंचा अतिशय वेगाने ताणल्यामुळे पोटाच्या आतड्यावर ताण पडून मोठी जखम झाली.त्यामुळे पोटात असह्य कळा उठत आहे,वैद्य म्हणाले.
त्यादिवशी पासून महाराणांनी अंथरुण धरले.थोडीही हालचाल झाली की पोटात असह्य कळा उठत.राजवैद्याचे उपचार सुरु होते,पण फरक पडत नव्हता कुॅंवर अमरसिंह व कुॅंवर शक्तिसिंह त्यांची रात्रंदिवस सेवा करीत होते.एवढा लोह पुरुष दिवसेंदिवस क्षीण होत खंगत चालला होता.रणांगणावर मोठमोठ्या शत्रूंना आपल्या शस्राने पाणी पाजणार्या आपल्या पिताजींना पोटाचा विकार जडून क्षीण होत जाणारा देह बघून अमर ला भडभडून येत होते.त्यांच्या इतर राण्याही महाराणांची सेवा करीत होत्या. मात्र महाराणी सुलक्ष्मीदेवी मात्र त्यांना बिलकुल एकटे सोडत नव्हत्या.
दर्भाच्या अंथरुणावर झोपलेल्या व बाजुलाच अर्धवट झोपलेल्या सुलक्ष्मींना मध्यरात्री अतिशय क्षीण आवाजात महाराणांनी हाक मारली..देवीss त्या दचकुन उठत,काय स्वामीss ?तुम्ही अशा रात्रीच्या रात्री जागल्याने तब्बेतीवर परिणाम होईल ना?माझ्या तब्बेतीचे काय घेऊन बसलात स्वामी?मला काय धाड भरलीय?आधी आपण ठीक व्हायला हवेत.देवी!आतां सुधारणा होईलसे वाटत नाही.आमचा अंतिम क्षण जवळ आलासे वाटते.नका..नका होss स्वामी असे बोलू…सम्राट अकबर सारख्या बलाढ्य शत्रूला त्राही त्राही करुन सोडणार्या महाराणा प्रतापसिंहा च्या तोंडी ही भाषा?देवीss मानवी जन्माची सांगता मृत्युनेच होते हे शास्वत सत्य आहे.तो केव्हातरी येणारच,त्याला काय घाबरायचे?मृत्यु म्हणजे चिरशांती! दुःख वेदनांचा समूळ नाश!मृत्युनेच मनुष्य जन्माची सांगता होते देवी.शल्य फक्त एकच आहे,आम्ही संपूर्ण मेवाड स्वतंत्र करुं शकलो नाही.चितोडगड व मांडलगड आमच्या मातृभूमीत नाही आणू शकलो.आणखी थोडे आयुष्य मिळते तर ही भूमी यवनमुक्त केली असती.शेवटी ही खंत सोबत घेऊनच जावे लागणार हे..हे..आमचे फार मोठे दुःख आहे.
क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
!!! महाराणा प्रताप !!!
अंतिम भाग -५५.
स्वामी! निर्धारपुर्वक सुलक्ष्मीदेवी म्हणाल्या,आम्ही आयुष्यभर सावली सारखी आपली साथ केली,आतां आपल्याला एकटे नाही जाऊ देणार! आपल्यानंतर तसेही माझेसाठी सारे संपल्यासारखेच आहे.मी आपल्याबरोबर सती जाईन.तुमची इच्छा!एवढे बोलण्या ने त्यांना थकवा आला.ते ग्लानीत गेले. महाराणी मात्र टक्क जाग्या होत्या.राज वैद्य प्रयतानांची पराकाष्ठा करुन वेग वेगळे औषध देत होते पण गुण येत नव्हता.दिवसेंदिवस त्यांची तब्बेत खालावतच होती.संपूर्ण मेवाडवर दुःखा चे सावट पसरले.कुॅंवर शक्तिसिंह,कुॅंवर अमरसिंह,भामाशाह,रावत कृष्णसिंह, तेजसिंह राठोड,सामंत,मंत्री,सरदार सर्व काळजीत पडले होते.केवढ्याही कठीण प्रसंगाला न जुमानणारे,दर्याखोर्यात, पहाड्यात वास्तव्य करुन रात्रदिवस स्वातंत्र्याचा जागर करणारे मिधड्या छातीचे महाराणा केवळ आतड्याच्या दुखण्याने मृत्युपंथास लागले होते.
पोटात मरणप्राय वेदना होत होत्या.त्यादिवशी सकाळी त्यांना जाग आली.त्यांची धाकटी राणी लोयणाराव ठाकूरची कन्या सुमती त्याच्या मुखमार्ज ना साठी हाती तसराळे घेऊन उभी होती. बाकीच्या दोन राण्या त्यांना आधार देऊन उठवून बसवत असतांना त्यांच्या पोटावर ताण पडल्याने भडभडून रक्ताची उलटी झाली.महाराणी सुलक्ष्मीदेवी त्यांच्या पाठीवरुन हात फिरवू लागली.कुॅंवर अमरसिंहने त्यांचे डोके मांडीवर घेतले. महाराणांच्या १५ राण्या,१७ पुत्र,आणि पांच कन्या चिंतीत,दुःखी,शोकाकुल होऊन त्यांच्या भोवती उभे होते.
महाराणांना दरदरुन घाम फुटला, चेहरा निस्तेज,देहातील शक्ती संपत आली.भिरभिरती नजर शक्तिसिंहावर टाकल्याबरोबर तो अगदी जवळ आला. अतिशय खोल आवाजात कुॅंवर अमर सिंहाचा हात त्याच्या हाती देत डबडब ल्या नेत्रानी म्हणाले,शक्तीss तूं आतां सिसोदिया राजवंशाचा जेष्ठ राजपुरुष आहेस.आमचे बलदंड सतरा पुत्र तुझ्या हाती सोपवत आहे.आम्ही मोठ्या कष्टाने
चितोडगड व मंडलगड सोडून संपूर्ण मेवाड स्वतंत्र करण्यासाठी फार मोठी किंमत मोजली.हे दोन स्वतंत्र करण्याचे आमचे अपूरे राहलेले स्वप्न पुरे करशील? दादा! कां ही निरवानिरवणीची भाषा? शक्ती! आम्ही कांही पळातच महायात्रेला निघणार आहोत.आमचे स्वप्न साकार करण्याचे वचन दे शक्ती!लवकर दे!फार थोडा अवधी उरला आहे.आम्ही वचन देतो दादा,आपले स्वप्न नक्की पूर्णत्वास नेऊ.पिताश्री जास्त बोलू नये,आपल्याला खुप त्रास होत आहे.अमर! आयुष्यभर जे भोगले त्यापुढे हा त्रास कांहीच नाही. उदयपूरच राज्य तुझ्या हाती सोपवत आहोत.तू मेवाड सिंदूर महाराणा प्रताप सिंहाचा छावा,बापसे बेटा सवाई व्हायला हवा.पिताश्री!आपल्यासारखाच मी तप्त ज्वालामुखी होऊन धगधगत राहीन. मोगलांचा अमंगल स्पर्श या पवित्र भूमी ला होऊ देणार नाही.महाराणा समाधान पावले.त्यांनी आपली अंधूक होत असले ली नजर सार्या गोतावळ्यावरुन फिरवली.ओळख विसरली जात होती. दालनातील सार्या करुण नजरा त्यांचे वर खिळल्या होत्या.महाराणांच्या महा प्रयाणाला प्रारंभ झाला.अडखळत क्षीण आवाजात म्हणाले,आम्ही पिताश्रींच्या इच्छेचा बळी ठरलो,पण कधी त्यांचा अनादर केला नाही.आमचे बधू अकबरा स मिळाले,आमचं पाठबळ गेलं,तरीही आम्ही खचलो नाही.आम्ही अकबर दरबारी मान झुकवावी म्हणून नाना प्रयत्न केले,पण सिसोदिया राजवंशाची मान खाली जाऊ दिली नाही.आम्ही वाघासारखे जगलो आणि आतां वाघ होऊनच मृत्युगुहेत शिरत आहोत.फक्त खंत एकच…चितोडगड व मांडलगगड स्वतंत्र करुं शकलो नाही.ए..क..लिं..ग.. जी..आ..म्हा..ला..क्षमा क..रा..क्ष..मा करा..भ..ग..वा..न…त्यांचा आत्मा अंनतात विलिन झाला.
दालनांत एकच आकांत उठला. सारा राजमहाल शोक सागरात बुडुन गेला.मेवाडचा केसरी ध्वज अर्ध्यावर आला.पंचवीस वर्षाचा दीर्घकालीन संघर्षाचा काळपुरुष कायमचा शांत झाला.मेवाडभर ही दुःखद वार्ता पसरली सारे मेवाड शोकाकुल दुःखी अंतःकरणा ने आपल्या प्रिय महाराणांच्या अंतिम दर्शनासाठी दाटी करुं लागले.महाराणी सुलक्ष्मीदेवी त्यांचेबरोबर सती गेल्या. धगधगणारी मेवाडभूमी कायमची शांत झाली.
कर्नल टाॅडने लिहून ठेवले..अकबर ची उच्च व हट्टी महत्वाकांक्षा,निपूणता, प्रचंड अमाप साधन सामुग्री,अफाट सैन्य असून देखील, निश्चयी,धाडसी महाराणां ची अदम्य वीरता,किर्ती दडपू शकला नाही.अरवली व कोमलगिरी पर्वतातील प्रत्येक भाग महाराणांच्या शौर्याचे कृत्य, उज्वल विजयाने पवित्र झाला.या पृथ्वी वर अनेक बदल,स्थित्यंतर होतील,पण महाराणा प्रतापसिंहांची कीर्ती अमर आहे या समाजात जोवर उच्च चारित्र्य,त्याग, शौर्याची कदर असेल तोवर महाराणा प्रतापसिंहांची स्मृती इथल्या देशवासियां ना स्फुर्ती देत राहील.
अशा या महान भारतीय सुपुत्राला कोटी कोटी प्रणाम!
समाप्त!
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.

