ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र. 835

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
 प्रकरण :-१२ वे, स्वरूपस्थिती अभंग ८३५

सहा चार अठरा धांडोळिती ज्यांतें । परी नेणवे सखा तो जवळी असतां ॥१॥ सखा निजसुखाचा जवळी असतां । पुढे पाहतां जाले वेडे चौघेजण ॥२॥ बोलों तरी आतां मौन्य पडिलें माये । शब्द हा न साहे सांगों कैसें ॥३॥ चिद्रूपाचा प्रकाश तोची आनंदाचा साभास । गुणागुणी नाश नातळेची ॥४॥ तें गिळुनीयां द्वंद्वासहित प्रपंचभास । तेथ स्थुळादि ब्रह्मांडास गिळुनी ठेले ॥५॥ ऐसिया सुख वस्ती आत्मप्रभा संविती । प्रकाशी प्रकाश स्थिति पूर्ण ठेली ॥६॥ तेथ बिंब प्रतिबिंब भान सरलें ज्ञानविज्ञान । हाचि नवलाव जाण तये ठायीं ॥७॥ निवृत्तिदास म्हणे ज्याचें तो जाणे । आतां जें बोलणें तोचि शीण ॥८॥

अर्थ:-

सहा शास्त्रे, चार वेद, अठरा पुराणे ज्याचा शोध करीत आहेत तो परमात्माजवळच असूनही त्यांना सापडत नाही. परमात्मा जवळ असतांना चारी वेद त्याला पुढे करून पाहू गेले. तो वेडे झाले.त्याच्याबद्दल काही बोलण्याचा प्रयल करावा तर त्याचे स्वरूप शब्दांनी वर्णन करण्यासारखे नसल्यामुळे मौनच स्विकारावे लागते. कारण शब्दाने त्याचे काहीच वर्णन करता येत नाही. त्याच्या ठिकाणच्या ज्ञानाचा प्रकाश तो आनंदाचा उदय होय. त्याच्या ठिकाणी गुण लागत नसल्यामुळे त्याला गुणीपणा येत नाही. म्हणून गुणी विशेषण त्याला लागू शकत नाही. त्याचे अव्यक्तस्वरूप टांकून व्यक्त स्वरूपांकडे नजर दिली तर सुखदुःखादि द्वंद्वे ज्यांत आहेत असा प्रपंच त्याचे स्वरूपांत लय पावतो.अशारितीने जगतांत असलेले ज्ञान, तेज, आनंद ही सर्व त्याच्याच ठिकाणी स्वतःसिद्ध आहेत.आत्मस्वरूपाच्या ठिकाणी हेच मोठे आश्चर्य आहे की त्याच्या स्वरूपात बिंब प्रतिबिंब, ज्ञान, विज्ञान वगैरे सर्व भाव मावळूनजातात. हा अनुभव ज्याचा त्याने घ्यावयाचा आहे याहून आणिक कांही बोलणे हा शीणच होय असे निवृतीदास माऊली ज्ञानदेव सांगतात.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading