ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र. 63

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  प्रकरण :-२ रे, हरिपाठ अभंग ६३

साधुबोध झाला तो नुरोनियां ठेला । ठायींच मुराला अनुभवें ॥१॥ कापुराची वाती उजळली ज्योति । ठायींच समाप्ति झाली जैसा ॥२॥ मोक्षरेख आला भाग्यें विनटला । साधूंचा अंकिला हरिभक्त ॥३॥ ज्ञानदेवा गोडी संगति सज्जनीं । हरि दिसे जनीं आत्मतत्वीं ॥४॥

अर्थ:-

साधुचा बोध झाला की मग न संपणारा ठेवा मिळतो. पण तो ठेवा म्हणजे हरिनामच आहे. व तो अंगोपंगात मुरवुन ठेवावा लागतो व तो अनुभव मोठा असतो. कापुराची वात पेटवली की तिची समाप्ती त्या ज्योतीत होते तसेच त्या हरिनामाची समाप्ती शरिराबरोबर व्हायला हवी. अशा साधुबोधाने नटलेला भक्त मोक्षाला पोहचतो व भाग्याचा ठरतो. साधुसंगतीची गोडी घेतली की तो जनात वनात हरिरुपाने आहे हा बोध होतो असे माऊली सांगतात.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading