👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड. प्रकरण :-२ रे, हरिपाठ अभंग ६४
पर्वताप्रमाणे पातक करणें । वज्रलेप होणें अभक्तासी ॥१॥ नाहीं ज्यांसी भक्ति ते पतित अभक्त । हरिसी न भजत दैवहत ॥२॥ अनंत वाचाळ बरळती बरळ । त्यां कैंचा दयाळ पावे हरि ॥३॥ ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा निधान । सर्वांघटीं पूर्ण एक नांदे ॥४॥
अर्थ:-
जो हरिनामाला सन्मुख होता नाही त्याला पर्वतायेवढी पापे वज्रलेपाप्रमाणे (न वेगळी होंणारी) चिकटतात. ज्याला जन्माला येऊन भक्ती करता येत नाही तो पतित अभक्त ठरतो. हरिनाम न घेता फक्त संसाराचा अनंत गप्पा रंगवतो त्याला तो कसा प्राप्त होईल? तो सर्वघटामध्ये असणारा परमात्मा ह्या जगताचे प्रमाण आत्माराम आहे असे माऊली सांगतात.
Previous Post
ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र. 63
Next Post
ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र. 65
