ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र. 519

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, ज्ञानकाण्ड.  
प्रकरण :-१ ले, अद्वैत अभंग ५१९

कासवाच्या परी आत्मा तो या देहीं । इंद्रिये जो पाही अवलोकी ॥१॥ सहज प्रकाश आहे तो करीत । स्वयें चेष्टवीत दीपापरी ॥२॥ जाणे येणे काही नाही आत्मयाशी । द्रष्टुत्व तयासी जाणिजे की ॥३॥ तद्विवर्त जीव अविद्यक मन । संसारबंधन’इयेचेनि ॥४॥ ज्ञानदेव म्हणे आत्मा शुद्ध बुद्ध । नव्हेचि पैं बद्ध कदाकाळीं ॥५॥

अर्थ:-

या देहामध्ये आत्मा कासवाप्रमाणे असल्यामुळे इंद्रियादि आपल्या अवयवांना प्रकाशित करतो.तात्त्विक प्रकाश कर्तृत्व त्याच्याकडे नाही. त्याच्या सहज प्रकाशाने देहादि व्यवहार होतात. म्हणून तो प्रकाशन करतो. असा दिव्याप्रमाणे गौण व्यवहार होतो. हा कोठे जात नाही वा कोठून येत नाही. मात्र जीवांच्या व्यवहाराचा साक्षी आहे.जीव त्याचा विवर्त आहे. व मन अविद्याकार्य याच योगाने त्या जीवाला संसार बंधन आहे. नित्य, शुद्ध, बुद्ध, असल्यामुळे याला केंव्हाही बंधन नाही. असे माऊली ज्ञानेश्वर सांगतात.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading