👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, ज्ञानकाण्ड.
प्रकरण :-१ ले, अद्वैत अभंग ५२०
वेदांत सिद्धांत देतात पैं हाक । स्तब्ध ते जंबुक येर शास्त्रे ॥१॥ तेंचि की प्रमाण साधनानुक्रम । येर भवभ्रम की आथी ॥२॥ ऐकजे ती शास्त्रे पडिलीं संदेहीं । होय नाहीं कांही म्हणूनियां ॥३॥ वेदांतीही भिन्न जाणा पूर्वपक्ष । लक्षितेती अती मूर्ख ॥४॥ काय बहिर्मुख नेणतीच येर । म्हणे ज्ञानेश्वर राजयोगी ॥५॥
अर्थ:-
संसाररूपी हत्तीस नाश करण्याला एक वेदांतशास्त्ररूपी सिंहच पाहिजे बाकीचे शास्त्रे कोल्ह्याप्रमाणे स्वस्थ बसतात. तेच शास्त्र मुमुक्षुला फार उपयोगी पडते. बाकीच्या शास्त्रांत संसारभ्रम दूर करण्याची शक्ती नाही. वेदांताखेरीज इतर शास्त्रांचा जे अभ्यास करतात. ते लोक अधिकच संशयातच पडतात.वेदांत मतातही खंडनाकरता पूर्वपक्ष घेतलेला असतो. तो त्यांच्या मतासी विरोधी असतो.त्यातच काही लोक पूर्ण लक्ष ठेवून आपला गोंधळ करून घेतात. असे ते अतिमूर्ख समजावे. असे जे मूर्ख पुरूष असतात.त्यांना ज्ञान प्राप्त होत नाही. असे राजयोगी माऊली ज्ञानेश्वर सांगतात.
