👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड. प्रकरण :-३ रे, नामसंकीर्तन महात्म्य अभंग १००
कापुराचे कलेवर घातले करंडा । शेखी नुरेचि उंडा पहावया ॥ मा ज्योती मेळे कैसा उरेल कोळिसा । भावें ह्रषीकेशा भजतां ऐसें ॥ ज्ञानदेव म्हणे वासना हे खोटी । नामयज्ञें मिठी दिधलिया विरे ॥
अर्थ:-
हवेत विरणाऱ्या कापुराचे अलंकार बनवुन ह
जरी करंड्यात जपुन ठेवले तरी ते विरुन जातात. तसेच कोळश्यानी अग्नी जवळ केला की कोळसेपणा राहात नाही तद्वत जीवाने हृषीकेशाचे भजन केले की जीवपणा राहात नाही. जीवपणात सर्वात खोटी वासना आहे परंतु नामयज्ञाची मीठी जीवाला पडली की ती वासना जीवपणा सकट नष्ट होते.