👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
प्रकरण :-१४ वे, रूपके विरहिणी अभंग ८८९
मी माझें म्हणतां ठकचि ठेलिये । आपुले जाति कूळ विसरूनी गेलिये ॥१॥ गुणाचा दुकाळ पडिला देशीं । निर्गुणासी कैसी रातलिये ॥२॥ बापरखुमादेविवर विठ्ठलु सये । सेजारासी नये काय करूं ॥३॥
अर्थ:-
परमात्मस्वरूपांचे दर्शन मला झाले. म्हणून आतां मी आणि माझे असे म्हणण्याला शिल्लकच राहिले नाही. त्यामुळे मी अमक्या कुळाची, अमुक जातीची हे सर्व विसरून गेले.ज्या परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी गुणाचा दुष्काळ म्हणजे अभाव आहे. अशा त्या निर्गुणरूपाच्या ठिकाणी काय माझे मन रमले आहे. ज्याच्या ठिकाणी माझे मन रमले आहे. ते माझे पिता व रखुमादेवीचे पती श्रीविठ्ठल ते माझ्या बिछान्यावर येत नाही काय करू? असे माऊली सांगतात.
