👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
प्रकरण :-३रे, श्रीनिवृत्ती व श्रीज्ञानदेव यांचा संवाद अभंग ५७७
सूक्ष्म साध्य काज सांगितलें स्वामी । धृति धारणा क्षमीं हरपल्या ॥१॥ सूक्ष्म सख्य नेलें विश्वरूप देहीं आलें । प्रपंचेसी मावळलें तिमिर रया ॥२॥ विशेषेंसी मिठी दिधली शरीरें । इंद्रिये बाहिरें नाईकती ॥३॥ ऐसें हें साधन साधकां कळलें । चेतवितां बझाविलें मन माझे ॥४॥ उतावेळ पिड ब्रह्मांडासहित । नेत्री विकाशत ब्रह्मतेज ॥५॥ ज्ञानदेव विनवी निवृत्तीस काज । हरपली लाज संदेहेंसी ॥६॥
अर्थ:-
बुद्धीला कळण्यास फार कठीण असे जे अत्यंत सूक्ष्म परमात्मतत्त्व समजून घेणे, हे जिज्ञासूचे मुख्य काज म्हणजे कर्तव्य आहे. आणि ते समजावून दण हे काम श्रीगुरूचे आहे. त्याप्रमाणे स्वामी निवत्तीरायांनी मला परमतत्त्व समजून दिलेत्यामुळे दुसरी सारी साधने धैर्य धारण, क्षमा वगैरे मावळून गेली. त्या सूक्ष्म तत्वाचा अंतकरणांत उदय झाल्या बरोबर सर्व विश्व नाहीसे झाले. ते गेले कोठेे त्याचे उत्तर ज्या देहांत परमात्मज्ञानाचा उदय झाला त्याच देहाचेे आंत परमात्मस्वरूपात परमात्मरूप झाले आणि सर्व प्रपंच व त्याचे कारण जे आत्मस्वरूपाचे अज्ञान तेही नाहीसे झाले.अंतकरणात मानाचा विशेष भाव होतो त्यातील बाधसमानाधिकरणाने विशेषभाव सामान्य चैतन्याशी एकरूप झाला ही स्थिती ज्या शरीरात झाली ते शरीर व इंद्रिये ही परमात्मरूप झाली. अर्थात् बाहा इंद्रिये आपआपले विषय घेईनाशी झाली असे साधन जो मी साधक त्या मला समजले आणि श्रीगुरुनी त्या ज्ञानाला जागे करून माझ्या मनाची समजूत घातली. अशा ज्ञानाचा उदय झाल्यावर पिंड ब्रह्मांड सर्व परमात्मरूप होऊन जाण्यास उशीर काय ? मी माझ्या श्रीगुरूनिवृतीरायांच्या जवळ विनंती करून ज्ञानसंपादन केले. त्यामुळे माझे सर्व संशय दूर होऊन पुन्हा पुन्हा जन्माला येण्याची लाज नाहीसी होऊन गेली.
