👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, ज्ञानकाण्ड.
प्रकरण :-१ ले, अद्वैत अभंग ५३६
पूर्वेचा हा भानु उगवेल पश्चिमे । परी भूमि जन्म नसे आम्हां ॥१॥ वांझेचा कुमर दिसेल प्रगट । न दिसे जरठ जड दष्टी ॥२॥ सिंधु येऊनियां मिळे सरितेमाजीं । परी आत्मकाजी क्रिया नको ॥३॥ पूर्ण ज्ञानदेवा प्राप्त आत्मरूप । त्रिविध हे ताप निरसती ॥४॥
अर्थ:-
पूर्वेचा सूर्य एखाद्यावेळेस पश्चिमेला उगवेल परंतु या कर्मभूमीत आम्हाला जन्म येणार नाही. कदाचित वाझेचा पुत्र प्रत्यक्ष दिसु शकेल पण वार्धक्य अथवा मंददृष्टी आम्हाला येणार नाही. कारण आम्हाला जन्म नसल्या मुळे आम्ही षड्भावविकाररहित आहोत. समुद्र गंगेस मिळणे ही अशक्य गोष्ट एखाद्या वेळेस शक्य होईल पण आत्म्याच्या ठिकाणी कोणती क्रिया होऊ शकणार नाही.आम्हाला ब्रह्मस्वरूप पूर्ण प्राप्त झाल्यामुळे आमचे त्रिविध ताप नाहीसे झाले. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.