ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.620

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
 प्रकरण :-४थे, ज्ञानासंबंधी उद्गार अभंग ६२०

थोकलें याच्या गुणीं तनुमनासहित । त्या निजतत्त्वी प्रीत निमाले वो माय ॥१॥ साही संवादले चौघे अनुवादले । पुरोतीउरलें म्यां देखिलें वो माय ॥२॥ कापुराची भांडुली परिमळें भरली । दीपी उजळी रूपनालें वो माय ॥३॥ तेथें नाहीं ल्याया रूप ना छाया । ऐसी ज्योति कर्पूराचिया उजळल्या वो माय ॥४॥ तेथें नाहीं उखणी एकला एकपणीं । देखतांचि नयनी उमळला वो माय ॥५॥ ऐसी जाली प्राप्ती खुंटली मागील गती । रखुमादेवीपती जोडला वो माय ॥६॥

अर्थ:-

मी शरीराने, वाणीने व मनाने श्रीकृष्ण परमात्म्याच्या गुणाकडे पाहून अगदी थक्क होऊन गेले. माझे सर्व प्रेम माझ्या परमात्मस्वरूपांत लय पावले.कारण जीवपद शुद्ध लक्ष्य आणि परमात्मा एकच आहे. असे चार वेद आणि सहाशास्त्र यानी त्याचे प्रतिपादन केले आहे तो त्यांच्याहून पलीकडे आहे तो परमात्मा मी आत्मत्वाने पाहिला. कापूराचे अनंत दागिने सुंगधाने भरल असले तरी त्याला जर अग्नीचा संबंध झाला तर त्याचे स्थूल रूप नष्ट होत. मग दागिना अंगावर घालण्यास त्याचे रूप राहातच नाही. त्याप्रमाणे स्थूल सूक्ष्म संघातात मूळचाच परमात्मा भरलेला आहे. पण ज्यावेळी श्रुति व श्रीगुरूरायांच्या प्रसादाने त्याचे ज्ञान प्रगट होते त्या वेळी आरोरित नामरुप नष्ट होते. फक्त परमात्म्याचा स्पष्ट भाव प्रतयास येतो. व त्या मुळे प्रपंचाची गती खुंटित होऊन जाते. ज्याच्या प्राप्तीमुळे संसाराची वाट मोडली गेली तो रखुमादेवीचा पती श्री विठ्ठल मला लाभला आहे असे माऊली सांगतात.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading