👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
प्रकरण :-१४ वे, रूपके विरहिणी अभंग ८८४
मन मुरडुनी घातलें मनातें । थोरू मारू तेथें होत असे ॥१॥ पुरे पुरे वो आतां जिणें तें केउतें । येणें वो पंढरिनाथें वेधियेलें ॥२॥ नचले नचले कांहीं करणें कामान । याचे पहाणेंची विंदान कामानिया ॥३॥ बापरखुमादेवीवरा विठ्ठलासी भेटी । संसारासी तुटी जाली गे माये ॥४॥
अर्थ:-
मनाला संसारापासून मागे फिरवून परमात्मचिंतनांत ते मन घातले असता तेथें त्या मनाला थोर मार बसतो. म्हणजे मन स्वरूपाने राहातच नाही. अशी जर स्थिति आहे, तर या दुःखरूप संसारात जगून काय करावयाचे आहे. संसार पुरे झाला. माझे पिता व रखुमाईचे पती जे श्री विठ्ठल म्हणजेच पंढरीनाथाने माझ्या मनाला अगदी वेढून टाकले आहे की. ज्याच्या पहाण्याच्या बलवान इच्छेने संसारिक पदार्थाची इच्छा करणे असा मनाचा व्यापार चालतच नाही.असे माऊली सांगतात
