रामायणातले संस्कृती दर्शन भाग 5

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

भाग 5


सर्व वेदवेत्या गुरुजनांना वंदन करुन रामायणातले संस्कृती दर्शन पाहुया.
रामायण काऴापासुन ते आज 21व्या शतकापर्यंत असलेल्या सुरु असलेल्या अनेक परंपरा व संस्कृतीतले साम्य आपण पाहतोय.विषय रामचंद्रांच्या राज्याभिषेकाचा सुरु आहे.
सिताभ्रशिखराभेषु देवतायतनेषुच ।
चतुष्पथे रथ्यासु चैत्येष्वट्टालकेषुच।। (अ.कां.6-11)
ज्या शिखरांवर पांढरेशुभ्र ढग वास्तव्य करतात त्या पर्वंतांच्या शिखरावर, त्याच सम उंच मंदिरांच्या शिखरांवर, चव्हाट्यांवर (चार रस्ते अेकत्र मिऴतात अशी जागा) रथांवर, गल्लीबोऴांमध्ये
नानापण्यसमृध्देषु वणिजामापणेषुच ।
कुटुंबिनां समृध्देषु श्रीमत्सु भवनेषुच ।। (12)
ज्या दुकानात विक्रिकरता योग्य अशा वस्तुच भरलेल्या असतात त्या मोठमोठ्या दुकानातुन, समृध्द असलेल्या गृहस्थांच्या घरांवरती,
सभासु चैव सर्वासु वृक्षेष्वालक्षितेषुच ।
ध्वजा:समुच्छ्रिता:साधु पताकाश्चाभवंस्तथा ।। (13)
विविध सभागृहांमध्ये, उंच वृक्षांवर, वेलींवर सर्वत्र ध्वज व पताका फडकवल्या गेल्या.


वरील श्लोक काऴजीपूर्वक वाचले असता दशरथर राजाच्या राज्यातल्या चार प्रधान गोष्टिंची माहिती कळते
1- गगनचुम्बी देवालये व उंच भवने (त्या काऴात स्थापत्य शास्त्र हे किती प्रगत होते हे यातुन बोधीत होते आजहि अनेक जुनी दगडात कोरलेली देवालये आपण पाहु शकतो ती रामायणकालीन नसली तरी जवऴपास हजारोवर्षे प्राचीन आहेत व आजहि सुस्थितीत आहेत या उलट नवीन तंत्रज्ञानाचा वापर व आधुनीक स्थापत्यतज्ज्ञांनी बांधलेल्या इमारती या अल्पायुषी ठरताहेत)
2- विक्रि करण्यास योग्य वस्तुंचीच व्यापारी दुकाने (या योग्य शब्दाने सर्व काहि सुचवले आहे)
3-रथांवर देखील ध्वज पताका लावल्या आहेत (आजहि समारंभात वाहनांवर झेंडे पताका लावतात वाहने सजवतात)
4 – अयोध्येत अनेक सभागृह आहेत (सभासु चैव) म्हणजे अयोध्या हि सांस्कृतीक किती प्रगल्भ होती पहिल्या लेखातच रामचंद्र हे नाट्यशास्त्र निपूण होते असा उल्लेख केलाय. नृत्य गीत नाट्य वादन या सारख्या अनेक कलांना राजाश्रय होताच त्या शिवाय का सभागृहे असा बहुवचनी उल्लेख आलाय.
आपण नेहमी पाहतो कि आपल्या गावात, शेजारी किंवा मंदिरात एखादा उत्सव असला कि सर्वत्र ध्वज पताका लावल्या जातात, तोरणे बांधतात अयोध्येतहि हेच चालु होते


पताका व वैजयंती असे शब्द पताकांकरता योजले असुन
केतन व ध्वज हा (शब्द संस्कृत मध्ये पुल्लिंगी व नपुं.लिंगी असा दोन्हि पध्दतीने वापरला जातो)
आनंदाच्या प्रसंगी ध्वज पताका फडकवणे हि आपली संस्कृती आहे.वर्षप्रतिपदा म्हणजे गुढिपाडवा या दिवशी ब्रह्मदेवाने या सृष्टिची रचना केली त्या आनंदानिमित्त “ब्रह्मध्वज “पूजन केले जाते. गुढि हा मराठि शब्द आहे.ब्रह्मध्वज किंवा ध्वज हा संस्कृत शब्द आहे. या दिवशी युगाचा आरंभ झाला म्हणुन याला “युगादि ” हि संज्ञा देखील आहे.
हल्ली काहि मंडऴी या सणावरुन हिंदुंच्या सणावारास लक्ष्य करत आहेत.हिंदुंचा हाच सण लक्षात घेवुन क्रुरकर्मा औरंगजेबाने धर्मवीर छ.संभाजी राजांना व कवि कलशाला हालहाल करुन प्रचंड यातना देवुन मारले ( शिखांच्या गुरुंना व त्यांच्या पुत्रांनाहि या आधी या औरंग्याने असेच ठार मारले होते त्यामुऴे औरंगजेब हा धर्मात्मा वगैरे नक्किच नव्हता) तो काऴा दिवस होता फाल्गुन अमावास्येचा .(पाडव्याच्या आदला दिवस) सणावाराला किंवा त्याच्या पूर्वसंध्येला हिंसक कृत्ये करण्याची परंपरा आजहि औरंग्याच्या पिलावळीने (पाकड्यांनी) आजहि सुरुच ठेवलीय त्यामुऴे हिंदुचे सणच दहशतीच्या सावटाखाली सदैव असतात.
आता हल्ली नवीनच टुम आलीय कि गुढिला बांबुची काठि वापरतात ती म्हणे हिंदुधर्मात निषिध्द आहे. (कारण ती प्रेतयात्रेत योजतात) या मुर्खांना एकदा धर्मशास्त्रात बांबुला काय म्हटलेय ते सांगा.
बांबुला वंशवृक्ष म्हटलेय कारण एक बांबु लावला कि अनेक बांबु आपसुकच उगवतात बेट तयार होत त्या प्रमाणे वंशविस्तार व्हावा या करता विवाह उपनयन वगैरे संस्कारात बांबुच्या सुप व परडिंचा वापर करतात.वेणु असहि एक नाव बांबुला योजतात
सोडमुंजीला बांबुचा दंड दिला जातो.
तेजो वे वैणु: असे वचन तैत्तरीय आरण्यकात आलय.


विवाहात ऐरणीदान (झाल) नावाचा एक विधि असतो त्यात बांबुच्या डालीत (परडि) किंवा सुपात 16 दिवे प्रज्वलीत करुन वराकडिल मंडऴींच्या मस्तकावर ठेवतात. याच कारण बांबु हा वंशवर्धन करणारा आहे.
सिंधुदुर्ग गोवा या प्रांतात गणेश उत्सवातल्या जेष्ठा गौरी पूजनासमयी वधुचे मातापिता वराकडिल मंडऴीना सुपातुन वायन देतात. (कोकणात याला वंशे म्हणतात हा शब्द देखील वंश शब्दाचा अपभ्रंश आहे)
एवढे संदर्भ दिल्यानंतर देखील बांबु वाईट किंवा अपवित्र ठरवला जाणे हे योग्य कि अयोग्य ते आपणच ठरवा.
ज्ञानेश्वरीत 4-6 व 14 अध्यायात गुढिचा उल्लेख आहे. तुकोबांच्या गाथेतहि गुढिचा उल्लेख येतो त्याचसोबत एकनाथ महाराजहि अनेक ठिकाणी गुढिचे उल्लेख आपल्या वाङ्- मयात करतात.
या सर्वांचा काऴ हा छ.शंभुराजांच्या हत्येच्या आधीचा आहे.
हाच विषय पुढच्या लेखात अधिक विस्तृत देण्याचा प्रयत्न करणार अाहे.
तुर्त लेखन मर्यादा
वे.भूषण दिगंबर जोशी वेंगुर्ले

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading