👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड. प्रकरण :-३ रे, नामसंकीर्तन महात्म्य अभंग ८८
अभाव संगती नाना भूत व्यक्ती । संसार पंगती मेळवी त्यासी ॥ हरिनामे शोक करी अभाव कामारी । याते दूरी करी हरिपाठे ॥ संतांची संगती वेदश्रुतीची मती । घेऊनिया हाती ब्रह्मशास्त्र ॥ ज्ञानदेव म्हणे नारायण नाणे । घेऊनि पारखणे भक्तिपेठे ॥
अर्थ:-
त्याच्या नामाबद्दल उदासिन असणारा जीव ज्याला श्रध्दा नाही त्याला क्षुद्र योनीत जन्म घ्यावा लागतो. हरिनाम घेत नाही त्याला दुःख प्राप्त होते व ते दुःख त्याच नामाने नाहिसे होते. संतांची केलेली संगत व श्रुतींचे महावाक्य पाहिले तर हे ब्रह्मनामशस्त्र होऊन जीवाचे रक्षण करते. त्याच नारायण नामाचे नाणे करुन भक्तीच्या पेठेत तपासुन घेत आहे असे माऊली सांगतात.
