👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड. प्रकरण :-३ रे, नामसंकीर्तन महात्म्य अभंग ८५
दसविये द्वारी वोहट पडिला । नेणता पैं गेला पहावया ॥ अवचिती वाट सांपडली पंथे । ब्रह्मनाम तेथें आलें हातां ॥ ज्ञानदेवा गीती निशाणी नाम । समाधि संजीवनी तारक हरि ॥
अर्थ:-
दहा इंद्रियांची दहा द्वारे ओस पडली व त्याला पहायला मन धावले. ते ब्रह्मनाम अवचित कळले व निजपंथाची वाट सापडली.ते नामच संजिवन समाधी पर्यंत पोहचवते तेच नाम मी गात आहे असे माऊली ज्ञानदेव सांगतात.
Previous Post
ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र. 84
Next Post
ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र. 86
