ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.625

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा फोटो min. सार्थ गाथा फोटो min min

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
 प्रकरण :-४थे, ज्ञानासंबंधी उद्गार अभंग ६२५

जुगादीचें जुग युगादीचें युग । लक्षाआदि लक्ष मावळलें गे माये ॥१॥ मावळल्यावीण भ्रांति जाल्या कोण्ही । निजब्रह्माची खाणी ठायीं न पडे गे माये ॥२॥ बापरखुमादेविवर निघोनी घेतला । निर्गुणचि जाला तयासहित गे माये ॥३॥

अर्थ:-

जिच्यामुळे जुग म्हणजे द्वैत उत्पन्न झाले. व ज्यापासून युग म्हणजे काल सुरु झाला. अशी जी माया ती लक्ष जी आत्मवस्तु तिच्या प्राप्तीच्या अगोदर अप्राप्ताची प्राप्ती नाही म्हणून मिथ्या ठरवून मावळल्यामुळे लक्ष्य म्हणजे आत्माकारवृत्तिही मावळली. ही भ्रमरूप माया लय पावल्यावांचून स्वस्वरूपाच्या आत्मवस्तुची खाण सापडत नाही. आम्ही, माझे पिता व रखुमादेवीवर बाप जे श्रीविठ्ठल, त्यांना अनात्मपदार्थातून निवडून काढून त्यांना आपलेसे करून तद्रूप म्हणजे निर्गुणच बनवलेे. असे माऊली सांगतात.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading