ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.८६

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  प्रकरण :-३ रे, नामसंकीर्तन महात्म्य अभंग ८६

भावाचेनि बळें घेतलें वैकुंठ । हरिनाम नीट वैकुंठ मार्ग ॥ सोपें हो साधन साधावयालागीं । नलगे उपाधि नाना मतें ॥

ज्ञानेसहित ज्ञान विज्ञानेंसि धन । वृत्तीचें समाधान निवृत्ती करी ॥ शांती दया क्षमा करुणानिधि प्रेम ।

नेउनि परब्रह्म भावे मिळती ॥ ज्ञानदेवो सांगे भावो मीनला गंगे । सुस्नात सर्वांगे हरि गंगा ॥

 अर्थ:-

 हरिनामाचा सरळ वैकुंठमार्ग आहे. भावाच्या बळावर नामाने वैकुंठ साधता येते. सोपे असलेले नामसाधन असुन त्यासाठी वेगळा उपाधी व मते असणे गरजेचे नाही.

त्यामुळे ज्ञानाचे ज्ञान व संसाराचे विज्ञान समजते असे सांगुन निवृत्तिनाथ वृत्तीचे समाधान करतात. दया क्षमा शांती करुणा व प्रेम ह्या सर्व

भावांचे एकत्रित करुन नाम घेतले तर परब्रह्म प्राप्त होते. असा भाव एकत्रित मनावर बिंबवल्यामुळे त्या नामगंगेत मी सर्वांग स्नान करुन घेतले असे माऊली सांगतात.

संत ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण साहित्य

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *