ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र. 822

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
image

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
 प्रकरण :-११ वे, बुद्धीरूपी सखीशी संवाद अभंग ८२२

एकी धांवे सुनाट एकीनें धरीलें बेट । एकीने शेवट साधियेला ॥१॥ कोणे तत्त्वी हरि कैसीयासी परी । नांदे कवणे घरी सांगिजेसु ॥२॥ सखी सांगे बाई भावो धरी देहीं । एकारूपा सोयी येईल घरा ॥३॥ बापरखुमादेविवर विठ्ठल अवचितां । निवृत्ति समता सांगितलें ॥४॥

अर्थ:-

कांही एक विचार न करता फुकट किरकोळ साधनांमध्ये म्हणजे दान व्रतादिकामध्ये धांवत सुटली. एकीने म्हणजे सांख्यादि तत्त्वविषयक विचार करणारी तिने स्थूल सूक्ष्मसंघातरूपी बेटांत शोध सुरू केला, तिसरीने म्हणजे वेदांत विचार करणाऱ्या तिने परमात्मप्राप्ती करून घेतली. वस्तुतः कोणत्या प्रकाराने, कोणत्या तत्त्वरूपी घरांमध्ये हरि नांदत आहे. असे मला सांगा हो. तिला दुसरी उत्तर देते, बाई, देहरूपी घरांत निष्ठावंत भावाने शोध केला तर तोच या नरदेहरूपी घरांत एकरूपाने प्रतितीला येईल.माझे पिता व रखुमादेवीचे पती श्रीविठ्ठल तेच विटेवर समचरणाने एकाएकी उभा आहते. असे निवृत्तीरायांनी सांगितले. असे माऊली सांगतात.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading