👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, ज्ञानकाण्ड.
प्रकरण :-१ ले, अद्वैत अभंग ५२५
साधूचा महिमा वर्णवेना कांहीं । ब्रह्मादिक तेही वर्णिताती ॥१॥ त्याचिये कृपें मोक्ष जिऊनियां । लाधिजे प्राणिया निश्चयेंचि ॥२॥ गंगेहूनि थोर संत शुचिष्मंत । गंगा शुद्ध होत त्याचे संगें ॥३॥ वडवानळ शुचि परी सर्वही भक्षक । इंद्र पुण्यश्लोक पतन होय ॥४॥ पतीत पावन कृपाळ समर्थ । देताती पुरुषार्थ चारी दीना ॥५॥ बाप रखुमादेविवर विठ्ठलाच्या संगी । झाला पूर्ण योगी ज्ञानेश्वर ॥६॥
अर्थ:-
साधूंचा महिमा आमच्या सारख्याला वर्णन करता येत नाही हे खरे. पण तो ब्रह्मदेवादिक वर्णन करतात.त्या संतांच्या कृपेने जेवण करुन प्राण्यांना मोक्षाचा लाभ होतो. सदाचारी संतांची योग्यता गंगेहूनही अधिक आहे कारण सांधूंच्या स्पर्शानि गंगा ही पावन होते. संतांना शुोद्ध अशा वडवानळाची उपमा द्यावी तर ती कमीच ठरते. कारण वडवानल सर्व भक्षक आहे. इंद्राची उपमा द्यावी तर त्यालाही अधोगती प्राप्त होते. पतीत पावन संत मात्र होत जनांना उद्धरुन नेणारे व चारी मुक्ती देणारे असे आहेत. माझे पिता व रखुमाईचे पती श्री विठ्ठल यांच्यामुळे व निवृत्तीच्या संगतीने मी पूर्ण योगी झालो. असे माऊली सांगतात.