👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड. प्रकरण :-५ रे, नामग्रहण अभंग १६०
पतीतपावन श्रीहरि । रामकृष्ण मुरारी । या वाहे चराचरीं । तो एक स्वामी जी आमुचा ॥ धन्य धन्य आमुचे जन्म । मुखीं रामराम उत्तम । जया रामनामें प्रेम । तोचि तरेल सर्वथा ॥ आयुष्य जाऊं नेदी व्यर्थ । हरिनामी जो आर्त । हरिवीण नेणें आणिक पंथ । धन्य जन्म तयाचा ॥ ज्ञानदेवें नेम केला । श्रीहरि हृदय सांठविला । त्यांनी संसारा अबोलाआला । देह खचला संत संगे ॥
अर्थ:-
पतितपावन असणारा त्या श्रीहरिला रामकृष्ण ह्या नांवाने संबोधतात तेच हा चराचराचे व आमचे स्वामी आहेत. ज्याला रामानामाविषयी प्रिती आहे सतत ते रामनाम तो जपतो तोच तरुन जातो त्याचा जन्म धन्य होतो. हरिनाम सोडुन अन्य पंथात तो जात नाही त्या हरिचे नाम आयुष्याचा क्षण वाया न घालवता आर्ततेने घेतो त्याचा जन्म धन्यतेला पावतो. ज्याने हा हरिनाम नेम हृदयापासुन केला त्याचा संसाराशी अबोला झाला व त्याचा देह संतसंगात पडला असे माऊली ज्ञानदेव सांगतात.