👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड. प्रकरण :-४ रे, नाममाला अभंग १२५
नाममाला घे पवित्र । अंती हेंचि शस्त्र । राम महामंत्र । सर्व बाधा निवारी ॥ भवकर्मविख । रामनाम होय चोख । हरेल भवव्यथादुःख । पुढे सुख उपजेल ॥ माळा घालीं हेंचि गळां । घे अमृताचा गळाळा । होईल वैकुंठी सोहळा । रामकृष्ण उच्चारणीं ॥ ज्ञानदेव माळा केली । सुखाची समाधि साधिली । जिव्हा उच्चारणी केली । अखंड हरिनाम ॥
अर्थ:-
नाम जपण्याची माला पवित्र असुन रामनाम हा महामंत्र आहे अंतकाळी हेच तुमचे शस्त्र आहे. सर्व बाधांचे निराकरण हे करते.भव कर्मांचे विष नाममंत्राने चोख( कर्म शुध्द होतात )बनते हेच नाम भव दुःख व व्यथा हरण करुन सुख देते. गळ्यात नाम मंत्र मंडित माळा व मुखात सतत रामकृष्णनामाची गुळणी घेत राहिले तर त्याच्यासाठी वैकुंठात सोहळा होईल. मी रामनामाची माळ केली ते नाम अखंड मुखात उच्चारत होतो त्यामुळे सुखाची संजिवन समाधी देवाला द्यावी लागली असे माऊली सांगतात.