ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.३६

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  प्रकरण :-१ ले, रूपवर्णन अभंग ३६

निळिये सारणी वाहे मोतियाचे पाणी । चिंतामणी अंगणी पेरियेला ॥ कैसा हा माव करुं गोविला संसारु । कृष्णसंगे धुरंधरे तरलो आम्ही ॥ हिरियाची खाणी दिव्य तेज मणी ।

सांपडला अंगणी सये मज ॥ सूर्यकर रश्मी चंद्र अहमस्मि । प्रकट झाल्या रश्मी जेथूनियां ॥ कल्पतरु चोखु चिंतामणी वेखु । मना माझी हरिखु देखियेला ॥ ज्ञानदेवी वल्ली विद्युल्लता सलिलीं । फळपाकें दुल्ली दुभिनल्या ॥

अर्थ:-
निळ्या मोत्यांच्या पाटातुन अंगणात पेरलेल्या चिंतामणीला पाणी दिले. त्या संसाराच्या मायेतुन आम्ही त्या कृष्णकृपेने तरलो. तो हिऱ्याच्या खाणीतील दिव्य मणी मनाच्या अंगणात सांपडला. चंद्र व सूर्य ह्यातुन प्रगट झालेल्या

रश्मी त्याच्या पासुनच तयार झाल्या आहेत. कल्पतरु व चिंतामणी समान असलेला तो पाहिला की मला आनंद वाटत आहे. विद्युलतेच्या कडकडाटात होणाऱ्या वृष्टीमुळे फळ व फुले खुप येतात तसाच आनंद श्रीकृष्ण दर्शनाने होतो असे माऊली सांगतात.

संत ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण साहित्य

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

One comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *