ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.८९
👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड. प्रकरण :-३ रे, नामसंकीर्तन महात्म्य अभंग ८९
यश किर्ती वानू नेणे मी वाखाणू । रामकृष्ण आम्हां सणू नित्य दिवाळी ॥ नरहरी रामा नरहरि रामा । पुराणपुरुषोत्तमा हरि गोपाळा ॥
या नेमी अक्रूर बोधला परीक्षिति उपदेशिला । अर्जुनाशी जाला साहाकारी ॥ ज्ञानदेव म्हणे नामेवीण जो नरु । तो होय भूमीभारु ये संसारी ॥
अर्थ:-
भगवंताचे यश कीर्ती सारखे षडगुण आहेत त्याची वाखणी मी करु शकत नाही. रामकृष्ण नामाचा उच्चारच आम्हाला नित्य दिवाळीचे सुख प्रतिदिन देतो. नरहरि, राम, पुराणपुरष, हरि, गोपाळ या सारख्या त्याच्या
नांवामुळे परिक्षितीला उपदेश व अक्रुराला बोध झाला.व तेच नाम जपल्याने तो अर्जुनाचा साह्यकर्ता झाला. जो नर ह्या नामाचा अंगिकार करत नाही तो भूमीला भार आहे असे प्रतिपादन माऊली करतात.
संत ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण साहित्य
ईतर लेख, गोसावी-बैरागी-संन्यासी\, ग्रंथाचे प्रश्नोत्तरे, ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, ज्ञानेश्वरी पारायण प्रत, प्रश्नोत्तर सूची, वैदिक-हिंदू संस्कृती, संत ज्ञानेश्वर चरित्र, संत ज्ञानेश्वर म. संपूर्ण चरित्र सूची, संत ज्ञानेश्वर संपूर्ण, संत तुकाराम संपूर्ण, संत नामदेव संपूर्ण, संत समाधी अभंग, संत सोपान काका संपूर्ण, सार्थ ज्ञानेश्वरी, सार्थ ज्ञानेश्वरी १८ वा अध्याय, सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय सूची