
श्रीमती मिनाक्षी देशमुख, जन्मगाव : पळसखेड, जि. अमरावती.
मुळ गांव : अकोला (विदर्भ)
अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत बालपण गेले. वाचनाचा / शिक्षणाचा प्रचंड ध्यास आणि आवड असल्याने विपरीत परिस्थितीमध्ये सुध्दा एम.ए. (सोसिओलॉजी), एम.ए. (संस्कृत) शिक्षण पूर्ण केले.
सन १९६९ मध्ये, श्रीमती राधादेवी गोयंका महिला महाविद्यालय, अकोला येथे नोकरीमध्ये रुजू. ३९ वर्षे अविरत सेवाकरुन, सावित्रीबाई फुले यांचा वसा घेऊन उच्च शिक्षणास हजारों मुलींना मदत केली. २००९ मध्ये, प्रबंधक (Registrar) पदावरुन सेवानिवृत्त.
दरम्यानच्या काळात, विरंगुळा म्हणून काव्य लेखनाचा छंद जोपासला. “आरशातील प्रतिबिंबाप्रमाणे हळव्या मनाच्या भावना एखाद्याच्या कवितेत दिसून येतात”, असे म्हणत स्वतःच्या मनातील भाव प्रत्येक कवितेमध्ये उत्कटपणे व्यक्त होत असे. वाचनाची अतिशय आवड, नव्हे वेडच. आतापर्यंत मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेतील सर्वच प्रकारचे पुस्तके, ग्रंथ, चरित्रे आदि जवळपास ६०००-६५०० पुस्तकांचे वाचन. सोबतच टिपणे काढून ठेवण्याची सवय, कधी काळी उत्स्फुर्त लेखनास उद्युक्त होऊन व्हॉट्सअपच्या माध्यमातून अश्याप्रकारे जगासमोर येईल, असे ध्यानीमनी नव्हते. “पंचकन्या” आणि “गुरुदेवोः” ही दोन पुस्तके प्रकाशित. तसेच, इतर सात पुस्तके प्रकाशनाच्या मार्गावर. आजपावेतो, धार्मिक, आध्यात्मिक, पौराणिक, ऐतिहासिक, संतचरित्रे असे एकुण ९५ व्यक्तिचरित्रांचे लेखन व सध्या अधिक व्यक्तीचरीत्रांवर संशोधन व लेखन सुरु आहे. दररोज पहाटे सुमारे ८०-९० व्हाट्सअप ग्रुपमधून सदर व्यक्तीचरीत्रांचे मालिकांप्रमाणे प्रसारण देशाविदेशातील अंदाजे १५००० वाचकांपर्यंत अविरत प्रसारीत.
सहजसोप्या भाषेत, कमीतकमी वेळेत जनसामान्यांना, विशेषतः नव्या पिढीला निःपक्ष आणि खऱ्या इतिहासाची माहीती व्हावी, तीसुध्दा मोफत आणि माफक शब्दांमध्ये म्हणून वयाच्या ७२व्या वर्षीसुद्धा हा सर्व खटाटोप. धाकट्या मुलाची गोव्यावरुन बदली होऊन सांगलीला २०२१ पासुन वास्तव्य.
संपर्क-
भ्रमणध्वनी ९४२१००८३९९


