ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.267

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  
प्रकरण :-८ वे, उपदेश अभंग २६७ 

आनंदु रे आजी आनंदु रे । सबाह्य अभ्यंतरी अवघा परमानंदु रे ॥ एक दोन तीन चारी पांच सहा । इतुके विचारूनि मग परमानंदी रहा ॥ सातवा अवतार आठवा वेळोवेळां । बापरखुमादेविवरू विठ्ठलु जवळा ॥

अर्थ:-

मी अंतरबाह्य आनंदमय झालो आहे व सर्वत्र आनंदी आनंदच आहे. आम्ही परमानंदी राहण्यासाठी जी साधने वापरली ती म्हणजे एक परमात्मा,दोन जीव, तिसरे शरीर, चौथा धर्म, अर्थ, काम, मोक्ष पाचवे पाच कोष, सहावे सहा शास्त्रे होत. माझे पिता व रखुमाईचे पती श्री विठ्ठल यांच्या जवळ जाण्यासाठी त्यांचा सातवा राम व आठवा कृष्ण या अवतारांचे सतत चिंतन करा असे माऊली सांगतात.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading