ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.६६

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  प्रकरण :-२ रे, हरिपाठ अभंग ६६

विष्णुविण जप व्यर्थ त्याचें ज्ञान । रामकृष्णीं मन नाहीं ज्याचें ॥१॥ उपजोनी करंटा नेणें अद्वय वाटा । रामकृष्णीं पैठा कैसा होय ॥२॥

द्वैताची झाडणी गुरुविण ज्ञान । तया कैचें कीर्तन घडे नामीं ॥३॥ ज्ञानदेव म्हणे सगुण हें ध्यान । नामपाठ मौन प्रपंचाचे ॥४॥

 अर्थ:-

 ज्याच्या मनात रामकृष्ण जप नाही ते मन नाही व ज्याला विष्णु स्मरण होत नाही त्याला ज्ञान नाही. हरिपाठ न करणारा जन्माला आलेला करंटा ठरतो त्याच्या तोंडात रामकृष्ण जप कसा करता येईल.

द्वैताला झाडायला गुरुकृपा लागते. व द्वैत संपल्या शिवाय हरिकीर्तन घडत नाही. सगुण रुपाचे सतत ध्यान केले व नामपाठ केला तर त्या मौनात प्रपंच विरुन जातो.

संत ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण साहित्य

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *