१९६, अभंग :- वासुगीच्या वनी सीता शोक करी । का हो अंतरले रघुनाथ दुरी :- संत तुकाराम सार्थ गाथा

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

संत तुकाराम सार्थ अभंग गाथा
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग

अभंग क्र. 196
वासुगीच्या वनी सीता शोक करी । का हो अंतरले रघुनाथ दुरी ।
येउनि गुफेमाजी दुष्टे केली चोरी । काहो मज आणिले अवघड लंकापुरी ॥१॥
सांग वो त्रीजटे सखिये ऐसी मात । देईल का नेदी भेटी रघुनाथ ।
मन उतावळि जाला दुरी पंथ । राहो न सके प्राण माझा कुडी आत ॥धृपद॥
काय दुष्ट आचरण होते म्या केले । तीर्थ व्रत होते कवणाचे भंगीले ।
गाईवत्सा पत्नीपुरुषा विघडिले । न कळे वो संचित चरण अंतरले ॥२॥
नाडियेले आशा मृगकांतिसोने । धाडिले रघुनाथा पाठिलागे तेणे ।
उल्लंघिले आज्ञा माव काय मी जाणे । देखुनी सूनाट घेउनि आले सुने ॥३॥
नाही मूळ मारग लाग अणीक सोये । एकाविण नामे रघुनाथाच्या माये ।
उपटी पक्षिया एक देउनि पाये । उदकवेढ्यामध्ये तेथे चाले काये ॥४॥
जनकाची नंदिनी दुःखे ग्लानी थोरी । चुकली कुरंगिणी मेळा तैशा परी ।
समोखी त्रीजटा स्थिर स्थिर वो करी । येईल तुकयास्वामी राम लंकापुरी ॥५॥

अर्थ
रावणाने सीतेचे हरण केले व सीतेला वासुकीच्या वनांमध्ये आणून ठेवले त्यावेळेस सीता शोक करत त्रिजटेला म्हणते हे त्रिजटे का बरे रघुनाथ माझ्यापासून दूर अंतरले असतील, मी माझ्या पर्णकुटी मध्ये होते दुष्ट रावण तेथे आला व माझे हरण केले आणि अवघड अशा अलंकापुरी मध्ये मला त्याने का बरे आणले? हे माझे सखये त्रिजटे मला सांग माझे रघुनाथ मला भेट देतील की नाही, रघुनाथाना भेटण्यासाठी माझे मन फार उताविळ झाले आहेत परंतु ते तर माझ्यापासून खूप दूर आहेत आणि आता माझा प्राण देखील या कुडीत राहीनासा झाला आहे. हे सखये मी असे कोणते दुष्ट आचरण केले होते किंवा कोणाची तीर्थ किंवा व्रत भंग केले होते काय, हे सखे मी कधी गाई आणि वासरू किंवा पत्नी आणि पती यांची ताटातूट केली होती काय मला माझे संचित काही कळेनासे झाले आहे का बरे मला रघुनाथांच्या चरणांचे अंतर पडले असेल? सोन्यासारखी कांती हरणा मुळे मी फसले मला वाटले त्या हरणाच्या कातड्याची चोळी करून घालावे त्यामुळे मी रघुनाथ यांना त्या हरणाच्या पाठीमागे पाठविले. लक्ष्मणाच्या आज्ञेचे उल्लंघन केले मला काय माहित त्या दृष्टा ची माया काय आहे, मी लक्ष्मण रेषेचे उल्लंघन करताच रावण रुपी कुत्रे यांनी माझे अपहरण केले. हे माय एका रघुनाथा वाचून मला दुसरा कोणताही मार्ग किंवा उपाय नाही. मला सोडवण्यासाठी जटायू पक्षाने धाव घेतली त्यावेळी रावणाने जटायू च्या अंगावर पाय देऊन त्याचे दोन्ही पंख उपटून टाकले जटायू पक्षी पाण्याच्या वेढ्यामध्ये पडला त्यामुळे माझेही तेथे काहीच चालले नाही. तुकाराम महाराज म्हणतात जनकाची मुलगी जानकी अशाप्रकारे दुःखाने वेढली गेली हरणाची व पाडसाची जशी चुकामुक व्हावी अशा प्रकारची स्थिति जानकीची झाली त्यावेळी त्रिजटा सीतेला शांत करत म्हणाली सिते शांत हो तुकयाचा स्वामी राम अलंकापुरी ला येईल आणि संपूर्ण अलंकापुरी जिंकून घेईल.

वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ तुकाराम गाथा
संत तुकाराम अभंग गाथा
तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा
तुकाराम गाथा सार्थ
तुकाराम महाराज गाथा सार्थ
सार्थ गाथा.

WARKARI ROJNISHI
www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
SARTHA TUKARAM GATHA
SANT TUKARAM ABHANG SARTHA GATHA
SARTHA ABHANG GATHA
TUKARAM MAHARAJ SARTHA GATHA
ABHANG SARTHA GATHA
SANT TUKARAM SARTHA GATHA
TUKARAM GATHA
SARTHA GATHA

संत तुकाराम म. सार्थ अभंग गाथा १ ते १००

संत तुकाराम म. सार्थ अभंग गाथा १०१ ते २००

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *